Patan Daily
24/01/2026
वनपरिक्षेत्र पाटण अंतर्गत मौजे धावडे येथे अवैध लाकुड वाहतूक करणा-या आरोंपीवर कारवाई.
पाटण
दि. २४/०१/२०२६ रोजी वनपरिक्षेत्र पाटण मधील मोरगिरी नियतक्षेत्रामध्ये असलेल्या मौजे धावडे गावचे हददीमध्ये लाकूड मालाची विनापासी विनापरवाना अवैध वाहतूक करत असणारा ट्रक मिळून आलेने आरोपीवर प्र.गु.रि.क्र. ०१/२०२६ दि.२४/०१/२०२६ अन्वये वनगुन्हा नोंद करणेत आला. सदर गुन्हयातील आरोपी १. संतोष शिवाजी बंदलकर सध्या रा. कराड ता. कराड जि. सातारा २. अंकुश हरिबा चोरगे रा. गोकुळ त. पाटण ता. पाटण जि.सातारा असून सदर आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरचे वनगुन्हयासाठी ०१ वर्ष कारावास किंवा रू.५०००/- पर्यंतचा द्रव्य दंड किवा दोन्ही अशा शिक्षेची तदतूद कायदयामध्ये आहे. सदर वनगुन्हयामध्ये आरोपींकडून ट्रक क्र.एम एच ४३ बीबी ७२०६ व विनापरवाना तोड केलेला लाकूड माल जळावू किटा २४.५९६ घमी जप्त केला.
पाटण वनपरिक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करणेत येत कि, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार तसेच राखीव वनामध्ये अतिक्रमण करणे हा कायदयाने गुन्हा आहे. असे घडल्यास संबंधितावर वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई श्री अमोल सातपुते (भा.व.से) उपवनसंरक्षक वन विभाग सातारा, श्रीम. जयश्री जाधव सहायक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) सातारा, श्री राजेश नलवडे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पाटण, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीनिलेश कुंभार वनपाल पाटण, श्री निखील अंकुश कदम वनरक्षक पाटण यांनी केली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 2010 साली करण्यात आली मात्र तब्बल 15 वर्षांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केलेली 'तारा'वाघीण ढेबेवाडी विभागाच्या जिंती या ठिकाणी दृष्टीस पडली.
21/08/2025
पूरस्थितीनंतर दिलासा;प्रतीक्षा शासनाच्या मदतीची
_
पुरामुळे घरांची पडझड;शेतीचे मोठे नुकसान
_
सातारा_सूर्यकांत पाटणकर.
_
ऑगस्ट च्या सुरुवातीला मान्सूनच्या विश्रांती घेतलेल्या पावसाने 16 ऑगस्ट नंतर झोडपून काढले.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात जोरदार पाऊस कोसळला यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला.त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली तर अतिवृष्टीच्या पावसाने घरांची पडझड होऊन शेतीचे हे मोठे नुकसान झाले आहे.बुधवारी सायंकाळपासून पावसाने उघडीप दिली असून शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागले आहेत.
_
सातारा जिल्ह्यात वाई महाबळेश्वर पाटण या तालुक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पश्चिम घाटाच्या डोंगर रांगांमध्ये येणाऱ्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या चार दिवसात अतिवृष्टीच्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले होते तर कोयना,धोम,बलकवडी,कन्हेर,तारळी या प्रमुख धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन घरांची पडझड तसेच नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्याचे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
_
कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकडच्या गावांना धोका निर्माण झाला होता.नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते.पुरामुळे शासनाने तात्पुरते स्थलांतर करून चार दिवस निवारा व जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुरामुळे घरादाराचे, शेतीचे, व्यवसायाचे झालेले नुकसान कसे भरून येणार या विवंचनेत सध्या अतिवृष्टीतील पूरग्रस्त आहेत.जिल्ह्यातील १२९ कुटुंबातील ३६१ नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते.पाटण तालुक्यातील ५३ कुटुंबांचे कराड ६ महाबळेश्वर ८ वाई ४० सातारा ३० मोरेवाडी २० अशा जिल्ह्यातील १२९ कुटुंबांचे स्थलांतर पुराच्या,अतिवृष्टीच्या धोक्यामुळे करण्यात आले होते.तर महाबळेश्वर येथील पाच जणांच्या घरांची पडझड झाली असून त्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे.भिलार येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भिंत पडून नुकसान झाले होते.
जिल्ह्यातील कोयना,धोम,धोम बलकवडी, कन्हेर,तारळी,उरमोडी या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा जोरदार पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतीचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.जिल्हा प्रशासनाने अद्यापही अतिवृष्टी पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली नसून केवळ पाहणी दौरा चालू आहे.मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांना मदत मिळणे गरजेचे आहे.जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात शेतीचे घरांचे सार्वजनिक मालमत्तांचे तसेच व्यवसायिकांचे किती व कोणत्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे अद्याप जाहीर केले नाही मात्र सध्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस थांबल्याने धरणातील होणारा विसर्ग कमी झाला आहे त्यामुळे पूर परिस्थिती आटोक्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.मात्र या पूरग्रस्तांना आता प्रतीक्षा शासनाच्या मदतीची लागली असून शासन केव्हा करणार असा प्रश्न आपत्तीग्रस्तांकडून विचारला जात आहे.
_
कोयना धरणाचे दरवाजे ३ फुटांवर
कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही घटली आहे.परिणामी गुरुवारी रात्री धरणाचे दरवाजे तीन फुटांवर असून धरणातून केवळ १९ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.पाणलोट क्षेत्रातील कोयना ४,०१४ नवजा ४,९१७ तर महाबळेश्वर येथे ४,६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Patan
Satara
415206