Mind Vision Solutions
*पॅशनची पॅशन 19 🔑🎯*
*आदिवासी विकास आणि शिक्षक- शिक्षण व्यवस्थापन भाग 2*
2018-19 दरम्यान आदिवासी विकास विभागाबरोबर असताना आदिवासी शिक्षकांची नेमणुक प्रक्रिया- अडथळे आणि नियोजनाबद्दल आपण मागच्या भागात पहिले. या भागात पाहूया पुढचा टप्पा.. या प्रक्रीयेदरम्यान समोर आले होते शिक्षकांबद्दल अनेक आक्षेप आणि अडचणी.... तोडगा तेव्हढाच प्रबळ तरीही कल्पक ठरवला. न भूतो न भविष्यति असं नेमकं काय घडलं..? सांगते- थोडं सविस्तर...
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, अधीक्षक, ग्रंथपाल आणि गृहपाल निवडले होते, अंदाजे 950.. हे सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खरं सांगायचं तर दुर्गम भागात काम करणार होते. मात्र *अनुभव नव्हता, शिकण्या- शिकवण्यामागची भूमिका स्पष्ट नव्हती.. संभ्रम होता, आपल्या आदिवासी असण्याबद्दल अभिमान बाळगायचा की न्यूनगंड याबद्दलही... मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच होते* .
प्रश्न समोर आले व्यवस्थापनाचे.. वारुळातल्या मुंग्यांसारखे... यांना प्रशिक्षणासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी बोलावणे, प्रत्येक (एकूण 29) प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी जागा, भोजन आणि इतर सर्व व्यवस्था, तज्ञ प्रशिक्षकांच्या त्या ठिकाणी येण्या-जाण्याची व्यवस्था, वेळा ठरवणे... सर्वच अत्यंत कठीण .. नव्हे अशक्यच... पुढचे आव्हान वेगळेच... जास्त मोठे.. नोकरीवर रुजू झाल्यानंतर *शक्यता होती, शिक्षकांच्या प्रवाहपतित होण्याची.. न करण्याची कारणे पुढे करण्याची..* तो बनचुकेपणा यायच्या आत त्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण (orientation) घेणे गरजेचे होते. आव्हान स्वीकारले.. थोडे मोठ्ठे...
मिटींग्ज बोलावल्या...संपूर्ण महाराष्ट्रात *आदिवासी शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रयोगशील प्रकल्प अधिकारी, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या... मागवल्या प्रशिक्षणासाठीच्या सूचना आणि संभाव्य अडचणी..* *संकल्पना आणि हेतूबद्दलच्या अडचणी* . जबाबदारी घेतली संपूर्ण महाराष्ट्राच्या टीमसोबत नियोजन आणि आयोजनाचीही......
दोन आव्हानं होती - सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या व्यवस्थापनाचे.. *सर्वांचे प्रशिक्षण - एकाच वेळी, एकाच ठिकाणी करण्याचे..* आणि दुसरे आव्हान होते नियोजन- आयोजनाचे.. *नियोजन- आवश्यक विषयांचे, तेव्हढ्याच दर्जेदार प्रशिक्षकांच्या निवडीचे आणि त्यांच्या सर्व प्रशिक्षणार्थींसाठीच्या उपलब्धीचे...* ठरवायच्या होत्या *शिकवण्याच्या योग्य पद्धती, माध्यमं... द्यायचे होते प्राधान्य भूमिका ठरवण्याला.. भूमिका- शिक्षणाप्रती, विद्यार्थ्यांप्रती, विषयाप्रती.. आणि आदिवासींप्रतीही...*
तज्ञ मार्गदर्शक निवडले.. ISSER चे विभागप्रमुख श्री भास बापट मांडणार होते विज्ञान शिकवण्याच्या पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, ‘आभा’चे संस्थापक डॉ मोहन देशपांडे मांडणार होते आरोग्याच्या समस्या आणि उपायांबद्दल, पालकनीती खेळघरचे तज्ञ प्रशिक्षक मांडणार होते कला, भाषा आणि गणित शिक्षणाचे रचनात्त्मक मार्ग, आदिवासींबरोबर अनेक वर्ष काम केलेल्या सिराज मॅडम सांगणार होत्या आदिवासी संस्कृतीचे महत्त्व. मी जबाबदारी घेतली विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती, शिकण्या- शिकवण्याची मानसिकता, भूमिकेचा स्वीकार, रचनात्मक शिस्त आणि वाचन संस्कृती वाढवण्याचे कल्पक मार्ग असे विषय मांडण्याची... धारणा तपासण्याचे अवघड आव्हान स्वीकारले पपेट शो तज्ञ मृदुला केळकर यांनी! याशिवायही अनेक विषय होतेच..
*सोपं नव्हतं- एकाच वेळी तज्ञ प्रशिक्षकांना 24 वर्गांमध्ये फिरवणं आणि तेव्हढीच उर्जा आणि दर्जा टिकवणं.* हे एकत्र साधणारा कल्पक मार्ग सुचवला स्वेच्छा-निवृत्त अधिकारी किशोरी गद्रे यांनी... या सर्व तज्ञांची सत्र व्हिडीओच्या माध्यमातून शूट होणार होती आणि त्यासह सत्र घेण्यासाठी सज्ज करायची होती विभागातल्याच अनुभवी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची टीम... तीन दिवस प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि लगेचच चार दिवस प्रत्यक्ष प्रशिक्षण असे साधारण आठवडाभर चालणारे प्रशिक्षण ठरले. लोणावळ्याचे अनेक प्रशिक्षण कक्षांनी सज्ज असलेले हॉटेल आरक्षित झाले.
*निकष ठरवले सत्र कसे असावे आणि नसावे याचे, प्रात्यक्षिकांचे, संपूर्ण परिसर शिक्षणाबद्दल दृश्य- अदृश्यपणे बोलत राहील याचेही* .. कामाचे टप्पे आणि दर्जाच्या निकषांसह चार्ट्स तयार झाले. पाठपुरावा तर करायचा होताच पण *दर्जाही तपासायचा होता- व्हिडीओजचा, प्रशिक्षण साहित्याचा, आणि घडावे-घडू नये अशा बारकाव्यांचाही...‘* रूपांतरण..’ असं म्हणून जादू तर घडणार नव्हती पण *सहभागींच्या किमान काही धारणा तर बदलायच्याच होत्या.* ‘लोणावळ्याला प्रशासनाचे प्रशिक्षण म्हणजे वर्षा-सहलीची संधी..’, ‘प्रशिक्षण दहा ते पाच म्हणजे म्हणजे आपल्यासाठी 11 पर्यंत आणि पाचनंतर वेळ रिकामा’, ‘शासकीय प्रशिक्षण म्हणजे लेक्चर्स.. फारफारतर एखादा खेळ..’, ‘शिकवण्यामध्ये काय शिकणार? त्याऐवजी अधिकाऱ्यांसमोर आपल्या प्रशासकीय समस्या मांडण्याची संधी घ्यावी.’... अशा अनेक धारणा.. वर्षानुवर्षे ‘ *असंच असतं’ असे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारख्या..*
*या अनलर्निंग बरोबर घडायला हवे होते कृतियुक्त शिक्षण* , *‘अनुभव घ्या- प्रात्यक्षिक दाखवा’ टाईप ‘सूर्य-जयद्रथाचे’ लगेचपण...* *पडायला हव्या होत्या शंका आणि शोधासाठी उपलब्ध हवे होते स्रोतही.. पुस्तकं, अनुभवी तज्ञ आणि माध्यमांचेही स्त्रोत...* *निर्माण व्हायला हवा होता विश्वास- व्यापक पातळीवरही हे बदल घडवता येतील याचा,* *यायला हवे होते झपाटलेपण शिक्षणाच्या उत्तमतेकडे जाण्याचे मार्ग शोधण्याचे...* *प्रशिक्षणकेंद्रातही... आणि बाहेरून पाहणाऱ्या यंत्रणेतही..*
यापैकी किती घडले? कसे घडले? अपेक्षित- अनपेक्षित अडचणींचे रुपांतरण कशात झाले? ... जाणून घ्यायला आवडेल? पाहूया पुढच्या भागात...
*माधुरी यादवाडकर*
*संचालिका, माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*9923032771*
गोपनीय पद्धतीचे नियोजन तर झाले.. आंदोलकांचा विरोधही वाढत चालला.. आव्हानंही... *एका परीक्षा केंद्रावर आंदोलकांनी घेराव घातला, परीक्षार्थींना प्रवेश करायला अटकाव केला.. पुन्हा पेपर काढले, पुन्हा प्रक्रिया झाल्या, पुन्हा परीक्षा घेतली* .. त्या केंद्रासाठी... निवडही झाली.. *विना आक्षेप.. प्रथमच* ...
*काय काय घडले प्रथमच?* *आदिवासी आश्रमशाळांसाठी केवळ आदिवासी शिक्षकांची निवड...* *online पद्धतीने.. त्यांच्याच भाषेत परीक्षा देण्याची मुभा.. विना आक्षेप निवड... आक्षेप ना पेपर फुटीचे, ना चुकीच्या प्रश्नांचे.. ना नेमणुकीसाठी गैरव्यवहार घडण्याचे...*
अजूनही दर्जेदार.. महत्त्वाच्या प्रक्रिया घडणार होत्या.. काय घडले ते जाणून घ्यायला आवडेल? पाहूया पुढच्या लेखात...
*माधुरी यादवाडकर*
*संचालिका, माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*9923032771*
*Teens बरोबर MUST-I - 15 🎳🎨🎯*
*आदिवासी आश्रमशाळा आणि भयमुक्त शिक्षण- भाग 2*
2018-19 दरम्यान आश्रमशाळांसाठी केलेल्या पायाभूत कामाबद्दल मांडते आहे... थोडे सविस्तर... आश्रमशाळांमधील वातावरण- नेमकं सांगायचं तर *शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती भूमिका बदलण्यासाठी काही प्रयोग करायचे ठरले* . वृत्तीबद्दल ही मुळातच संथपणे चालणारी प्रक्रिया.. काही परिणाम लगेच दिसू शकतात पण ते अंगवळणी पडणे, मुळातून बदल होणे आणि ते प्रत्यक्ष दिसणे हे मात्र वेळ घेणारे काम... इथे तर *संपूर्ण 1800 बदलांचा त्यांना स्वीकार करायचा होता, जुन्या, सोयीच्या सवयी सोडण्यासाठी तयार व्हायला लागणार होते...*
‘ *ई बिडा उठाए की नाही?...’* शंकां तर होतीच पण त्याचबरोबर होता *निर्धार, सामील व्हायचे नव्हते फक्त नावे ठेवणाऱ्यांच्या गटात, तर भाग व्हायचे होते पायाभूत बदल करणाऱ्यांचा...* तेही *अडचणी उल्लंघून यश कधी मिळेल याबद्दल कोणतीही खात्री नसताना...*
प्रयोगाचा आराखडा तयार केला. .त्यावेळचे अभ्यासू आणि विचारवंत *आयुक्त मा डॉ किरण कुलकर्णी* सर यांच्यासमोर मांडला... कारणही तितकेच प्रखर होते. त्या काळात विद्यार्थिनींच्या शोषणाच्या काही केसेस प्रकर्षाने समोर आल्या होत्या... अनेक महिने त्या याबद्दल बोलल्याच नव्हत्या आणि इतके होऊनही त्या विद्यार्थिनींना बोलते करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते. शाळेतल्या शैक्षणिक आणि इतर अडचणींबद्दलही विद्यार्थी बोलत नव्हते...कारणं होती *भीती.. विचार करण्याची सवय नसणे.. आपण असेच आहोत या धारणेचा प्रभाव... कितीतरी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कारणं..* कुलकर्णी सरांना याची जाणीवही होती आणि दूरगामी परिणामांबद्दलची दूरदृष्टीही... त्यांचे पाठबळ मिळाले.. विश्वास दृढावला..
सहभागी केले ‘ *अ-भय *अभियान’च्या** प्रतिनिधींना.. मुलांच्या भयमुक्त जगण्यासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या *गौरीताई देशमुख* आणि त्यांच्या टीमला.. टीम होती *अनुभवी, अभ्यासू, तज्ञ आणि समजपूर्वक बदलाभिमुख...*
फक्त विद्यार्थ्यांबरोबर किंवा फक्त शिक्षक असं काम करून चालणारच नव्हतं. अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांबरोबरच काम करण्याचे नियोजन केले.. दोन टप्प्यांमध्ये काम करायचे ठरवले. एका आश्रमशाळेतला एक वर्ग- संबंधित शिक्षक आणि अधीक्षक यांच्याबरोबर *विधायक शिस्त- वर्गसभा आणि पुरक उपक्रम- याबद्दलचा पायलट प्रकल्प-* हा होता एक टप्पा, आणि त्याच वेळी *दुसऱ्या टप्प्यावर TRTI मध्ये सलग प्रशिक्षणं आयोजित केली* , *सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक/ अधीक्षिका आणि शिक्षक प्रतिनिधी* यांच्यासाठी... या प्रशिक्षणांसाठी विषय निवडले माहिती देणारे- *मुला-मुलींच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढीच्या टप्प्यांची आणि प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण- मदत करण्यासाठीची माहिती* ... विषय विचार बदलवणारे- मुलांना आदराने- हो, *मुलांना आदर, प्रेमाने आणि विश्वासाने वागवायचे म्हणजे काय करायचे* याबद्दल विचार करायला लावणारे विषय, आणि सत्र *शिक्षा किंवा बक्षीस- लालूच यांचे परिणाम सांगणारे* - short term आणि long term परिणाम... सत्र भूमिका ठरवणारे- *मुलांना अभ्यासाच्या, स्वत;च्या भल्याच्या प्रत्येक वळणावर योग्य पर्याय निवडता यावेत* यासाठी... आणि हो, भूमिका ठरवायची होती - *मुलांच्या गैरवर्तनाच्या वेळीचीही* ... आणि सत्र होते *डोळसपणे बघायला लावणारे- स्वत:च्याही वर्तन- सवयींकडे...* अर्थात कोणालाही *ब्लेम किंवा गिल्टच्या फेऱ्यामध्ये न अडकवता स्वीकार आणि सुधारणेकडे नेणारे...* *विधायक शिस्तीच्या पद्धतीचा वस्तुपाठच होता तो!*
सर्व सत्र *कृती आणि उपक्रमांवर आधारितच* योजली... शारीरिक बदल, समाजाची मानसिकता घडण्यामागचा इतिहास अशा माहितीच्या सत्रांमध्ये होता आनंद, उत्साह... खरी कसोटी होती मुलांच्या मानसिकतेबद्दलचे विचार आणि शिस्तीमागची भूमिका निवडण्याच्या सत्रात... कसोटी सहभागींची, आणि प्रशिक्षकांचीही.. सत्रांमध्ये गरमागरम चर्चा- वाद रंगत होते... माध्यम निवडले होते रोल प्लेचे- त्यामुळे त्यांना *परिस्थिती पेचाची आहे याचा स्वीकार तर करता आला* , *गतानुगतिक पद्धतींचे अपयशही आधीच मान्य केले होते* त्यामुळे आता नव्या पद्धती समजून घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. मग आरोपांची जागा घेतली शंकांनी... ‘ *अहो मुलांना शिक्षा केली नाही तर ती डोक्यावर बसतील ना?’, ‘तुम्ही विश्वास टाका म्हणता, पण चोरून व्यसन करताना (मोबाईल वापरताना/ खोटं बोलताना/ शिव्या देताना/ लहान मुलांना त्रास देताना... यादी मोठी होती..) सापडले तर? नव्या पद्धतीत आम्ही नक्की कसं वागायचं?’ ‘मुलांवर प्रेम तर खूप करायचं असतं आम्हाला पण गैरवर्तन घडलं की पुढचे अनेक दिवस राग, धाक, कडक शिस्त याचा मुखवटा पांघरावाच लागतो.. अशा वेळी काय करावे..?’ ‘प्रेमळपणा म्हणजे मुलं म्हणतील तसं वागायचं नाही आणि धाकाच्या जागी ठामपणाचं रोपण करायचं हे बुद्धीला तर पटतंय पण कृतीमध्ये आणण्यासाठी स्वत:चा कायापालटच करावा लागेल..’* शंका संपतच नव्हत्या... वारुळातून येणाऱ्या मुंग्यांसारख्या... शिकलेल्या मूल्यांचा आधार घेतला... उपाय निवडले...
विषयांच्या ओघात काही कळीच्या मुद्द्यांनाही हात घातला गेला. जे *वास्तव समोर आले त्याने आम्हालाही क्षणभर अवाक केले* -एक मुख्याध्यापक उघडपणे- ठामपणे सांगत होते, ‘काही गरज नाही आत्मविश्वास, शिक्षण यावर इतके खोलवर कष्ट घेण्याची.. मी पाठांतरची आणि मार्क मिळवण्याची पद्धत शोधली आहे... ती द्या सगळ्यांना.. रिझल्ट आला की झालं..’, ‘आदिवासी भाषांमध्ये बोलायची परवानगी कशाला देता? आपल्याला त्यांना मराठीच नाही तर इंग्रजी माध्यमाकडे न्यायचे आहे...’ याला *ठामपणे तरीही शांतपणे उत्तर देणे* ही आमची जबाबदारी होती.
हिंसा- व्यसन या विषयांवरील सत्रात समोर आले काही सत्य... अनेक सहभागींसाठी रोजचे व्यसन अपरिहार्ह्य होते. अनेक पुरुष घरात शारीरिक हिंसा करत होते.. बायको- मुलांना मारणे हा शिरस्ता होता. त्यांचे सहकारी त्यांच्यासमोरच त्याबद्दल सांगत होते. (डोळ्यासमोर ‘बाई हा चोरून सिगारेट ओढतो-‘ असं सांगणारा वर्गच उभा राहिला) *लाज वाटली (किंवा नाही वाटली), माना खाली घातल्या तरी लगेच बदल होणार नव्हते हे दिसत होते..* अगदी स्पष्ट सांगू? कसोटीची वेळ आमच्यावर आली... ‘असे करू नका.. परिणाम किती वाईट होतो..’ असे *गुळगुळीत झालेले शब्द वापरून, टाकणं टाकता येणार नव्हतं* ... *दोन दिवसांच्या सत्राच्या मर्यादा होत्या , त्यांच्यातल्या बदलाला स्वत:पासून सुरुवात व्हावी ही आमची आंतरिक तळमळही होती* . विधायक शिस्तीच्या मूलतत्वांच्या आधारावर बोलणे पुढे नेले, *का आणि काय करायचे याच्याच बरोबर समज असलेल्या सहकाऱ्यांचे टीमवर्क आणि किमान बदलांचे निकष ठरवून उपायादाखल कृतीचे नियोजन केले.*
शेवटी निघताना सर्वांच्या चेहऱ्यावर होते *समाधान - माहिती आणि सकारात्मक मार्ग मिळाल्याचे* ... पण त्याच वेळी होती *साशंकता- आपल्यात मुरलेल्या जुन्या सवयींबद्दल, वरिष्ठांची भूमिका (किंवा आडमुठेपणा), इतर सहकाऱ्यांचे सहकार्य (किंवा असहकार्य) अशा अनेक गोष्टींबद्दल* .. ठळकपणे दिसत असे विचारांची सरमिसळ. पण त्याचबरोबर *रुजली होती जाणीव आणि समजेत झालेले बदल* ..’मला लक्षातच आलं नव्हतं *हाताने दिलेल्या मारापेक्षा तिरकस बोलण्याच्या जखमा जास्त टिकतात* ... आता बोलताना खूप विचार करावा लागेल.‘, ‘ही पद्धत फक्त *शाळेतच नाही तरी घरी पण वापरता येईल..* त्यामुळे *माझे आणि वयात येणाऱ्या मुलांचे नाते सुधारेल* आशी आशा वाटायला लागली आहे.’ , दबक्या आवाजात असाही मुद्दा आला- ‘ *आमचे वरिष्ठ पण आम्हाला अशा सन्मानाने वागवू शकले तर?* *उतरंड, हार-जीत यांची गरजच उरणार नाही.’ विचार होते बदलांचे... समजेतून आलेल्या विचारांचे...*
काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आले का? शाळेतल्या पायलट प्रकल्पाचे काय झाले? पाहूया पुढच्या लेखात...
*माधुरी यादवाडकर*
*संचालक*
*माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*९९२३०३२७७१*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Pune
411021