Career Disha
22/02/2023
*डॉ. श्रीराम गीत*
*एम.एस.साठी*
*परदेशात शिकायचय*
(क्रमांक तीन)
परदेशी शिक्षण चांगलं असतं,ते गुणवत्ता पूर्ण असतं,नवीन तंत्रज्ञान आणि अद्यावत माहिती यांचा संगम परदेशातील शिक्षणात मिळतो, तेथील विद्यापीठांचा दर्जा उत्तम असतो हे आपले सामान्य ज्ञान. याला पूरक अशी- स्पर्धेत धावण्यापूर्वी- मार्कांच्या आकड्यांची माहिती पाहूयात.
सर्वांचा लाडका, जगभरातील बहुतेकांचे आकर्षण असलेला देश म्हणजे अमेरिका. कोणतेही पदव्युत्तर शिक्षण तेथे घ्यायचे असेल तर ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन म्हणजेच जीआरई ही परीक्षा द्यावी लागते. अमेरिकेतला जन्म, अमेरिकेतली पदवी असली तरी सुद्धा ही परीक्षा द्यावी लागते. थोडक्यात या परीक्षेनंतर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि गणिती समज या दोन्हीचा अंदाज या परीक्षेतून घेतला जातो. यातील गुणानुसार प्रवेश मिळतो.परदेशातून आलेल्या प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला हिच्या जोडीला टोफेल म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लँग्वेज ही परीक्षा किमान मार्काने उत्तीर्ण व्हावे लागते. अमेरिकन विद्यापीठात शिकवले जाणारे इंग्रजी माध्यमातील विषय समजण्यासाठी हा निकष लावतात. अमेरिका सोडून अन्य इंग्रजी भाषिक देशांमध्ये आयईएलटीएस ही परीक्षा घेतली जाते.
किमान 290 ते जास्तीतजास्त 340 अशा मार्कांच्या गुणवत्तेनुसार विविध विद्यापीठातील प्रवेशाची सुरुवात होते. पदवीनंतरचा कामाचा अनुभव, पदवी दरम्यान केलेले अन्य सामाजिक काम, एखाद्या कलेतील गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण या साऱ्याचा जीआरईच्या मार्काचे जोडीला पूरक म्हणून उपयोग होतो.
अजून दोन गोष्टींना तिथे महत्व दिले जाते. एसओपी म्हणजे तुमचा येथे शिक्षणासाठी येण्याचा उद्देश स्टेटमेंट ऑफ पर्पज या नावाखाली तुम्हाला मांडायचा असतो. तुम्हाला शिकवायला असलेल्या एखाद्या प्राध्यापकाचे रेकमेंडेशन लेटर हेही महत्त्वाचे ठरते.
*शिकवणी*
केजी पासून क्लास लावण्याची भारतीय पद्धत असल्यामुळे यातील प्रत्येक गोष्टीसाठी क्लास सारख्या एखाद्या पूरक एजन्सीची मदत भारतीय विद्यार्थी घेतात हे आता अमेरिकन विद्यापीठातील सर्वांना माहीत असलेले उघड गुपित झाले आहे. इतकेच काय शिक्षणाचा उद्देश किंवा रेकमेंडेशन लेटर हे सुद्धा विद्यार्थी स्वतः न बनवता बनवून घेतात. अमेरिकेतील लीग विद्यापीठे या नावाने ओळखली जाणारी पहिली वीस विद्यापीठे अशा शिकवणी बहाद्दरांना सरसकट नाकारतात. अशा विद्यापीठात प्रवेश हवा असेल तर किमान 330 इतका जीआरईचा स्कोअर लागतो. खरे तर या पातळीला पोहोचू शकणारे भारतात सुद्धा तितक्याच उत्तम संस्थेत सहज प्रवेश मिळवू शकतात. गंमतीची गोष्ट म्हणजे अशा भारतातील सर्वोत्तम संस्थांमध्ये कॅम्पस सिलेक्शन साठी जगातील सर्वच नामवंत कंपन्या किमान गेली दहा वर्षे स्वतःहून येत आहेत. एवढेच नव्हे तर तिथे दोन वर्ष प्रशिक्षण व काम केल्यावर जगभरात त्यांच्याच शाखांमध्ये कामासाठी पाठवले जाते. अमेरिकेत पदवीधर पदवी घेतल्यावर ज्या कंपन्यांत नोकरी मिळाल्याचे कौतुकाने व मानाने सांगितले जाते त्या साऱ्या कंपन्यांची इनक्युबेशन म्हणजेच संशोधन केंद्रे बंगलोर ,चेन्नई, गुरूग्राम येथे आहेत.हे सामान्य ज्ञान सहसा विद्यार्थी,पालकात सापडत नाही.
*देशांतरासाठी शिक्षण*
हा एक वेगळाच विषय आहे. एक पदव्युत्तर पदवी घेऊन तिथे नोकरी मिळवणे व नंतर स्थायिक होऊन ग्रीन कार्ड किंवा नागरिकत्व मिळवणे यासाठी अमेरिकेतील सर्व अन्य विद्यापीठांची दारे अक्षरशः सताड उघडी आहेत.अशा विद्यापीठात शिकणारे जगभरातून आलेले सत्तर टक्के विद्यार्थी परदेशी असतात. त्यांनी दिलेल्या फीवरच ती चालतात.परदेशी विद्यार्थी मिळवणे याचे जोरदार मार्केटिंग ती करतात.इंग्लंड व आयर्लंड येथील अनेक विद्यापीठानी भारतीय शहरात प्रदर्शने मांडणे हा आता नित्यनियम झाला आहे.
गेल्या वर्षात भारतीय विद्यार्थ्यांनी केवळ अमेरिकेतील विद्यापीठांना भरलेल्या फीचा आकडा फक्त 42 अब्ज डॉलर इतका आहे. तेथील दर्जेदार विद्यापीठात उत्कृष्ट शिक्षण घेणाऱ्यांचे यामध्ये शून्य योगदान असते.कारण त्यांना जवळपास सगळी फी माफी मिळते.
स्पर्धा ही जगात सर्वच देशात असते याचे हे बोलके उदाहरण.
-------------×------------
*करिअर कौन्सेलर*:9960674094
18/02/2023
*डॉ. श्रीराम गीत*.
(9960674094)
*चांगली पदवी घ्यायला*
*परदेशात शिकायचय*
(क्रमांक दोन)
बारावीनंतर परदेशात शिकायला जाणाऱ्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेबद्दल आपण मागील लेखात माहिती घेतली. अमेरिकेत कोणत्याही पदवीकरता जायचे असेल तर एसएटी ही प्रवेश परीक्षा देणे गरजेचे असते हे मागच्या लेखातच स्पष्ट केले आहे. या परीक्षेमध्ये 1600 पैकी किमान 900 गुण मिळवणे गरजेचे असते. चांगले मार्क तेराशे, तर उत्तम चौदाशे पन्नास समजले जातात. या मार्कांवर अवलंबून बऱ्या वाईट कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो.
स्पर्धेला टाळण्यासाठी ही एसएटीची परीक्षाच टाळणारे अनेक विद्यार्थी अन्य देशांचा पर्याय शोधायला सुरुवात करतात. त्यामध्ये फक्त इंग्रजीवर अवलंबून असलेली आयईएलटीएस परीक्षा गरजे इतक्या मार्काने पास होऊन प्रवेश देणारे अनेक देश आहेत. ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड आयर्लंड इंग्लंड सिंगापूर यांचा त्या समावेश होतो. पदवी शिक्षणाच्या खर्चामध्ये फारसा फरक पडला नाही तरी प्रवेशाची सुलभता खूपच बदलते. अडचणीचा भाग एकच राहतो तो म्हणजे या देशात स्थायिक व्हायला विद्यार्थी फारसे उत्सुक नसतात. तसेच इंग्लंड व आयर्लंड सारखे देश तुम्हाला नोकरी देण्यास अजिबात उत्सुक वा तयार नसतात.मिळणारी फी घ्यायला, शिकायला स्वागत केले जाते.नोकरीसाठी नाही.
*फसवणूक*
कॅनडा सारख्या देशांमध्ये नामधारी शैक्षणिक संस्थांकडून आणि एजंटांकडून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यापर्यंत अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षात घडले आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची चीन व युक्रेनमधील फरपट अजूनही संपलेली नाही. हे सारे समजून घेण्याचा एकच साधा उपाय म्हणजे जिथे फक्त पैसे भरून प्रवेश मिळतो कोणत्याही प्रवेश परीक्षेला, त्यातील स्पर्धेला तोंड द्यायला लागत नाही अशा शैक्षणिक संस्था किंवा असे देश टाळलेले बरे.
एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करण्याची गरज आहे. सायन्स, इंजीनियरिंग, कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे आकर्षण खूप मोठे आहे. या उलट ह्युमॅनिटी, मास कम्युनिकेशन, लायब्ररी सायन्स व म्युझियालॉजी, डिझाईन, आर्किटेक्चर या क्षेत्रात प्रगत देशामध्ये मान व मागणी दोन्ही आहे. कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, आर्बिट्रेशन, फायनान्स या विषयांमध्ये हुशार पदवीधरांची गरज व मागणी पण आहे.
*वय आणि समज*.
भारतातून पदवीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय जेमतेम 18 पूर्ण असते. वर उल्लेख केलेल्या सर्व देशातील विद्यार्थी यावेळी स्वयंपूर्णपणे, घर सोडून, पालकांची आर्थिक मदत न घेता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.ती तिथली शंभर वर्षांची पद्धत आहे. याचा विचार आपल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी करायची गरज आहे. आपला पदवीधर विद्यार्थी कसाबसा ही जबाबदारी घेण्यासाठी सक्षम होतो. त्यामुळे पदवीवर्गातील बहुसंख्य स्थानिक विद्यार्थी स्वयंपूर्ण तर भारतातून गेलेली ही मुले पालकांच्या मनी ऑर्डर वर अवलंबून हे दृश्य सरसहा आढळते.
कोणाच्याही निकोप स्पर्धेला तोंड देण्यास हे मारकच ठरते ना?
-----------
14/11/2022
22/04/2022
*इंजिनीअरिंगची सीईटीची परीक्षा ऑगस्टमध्ये गेली आहे*.
मे ,जून ,जुलै व ऑगस्ट असे शंभर दिवस फक्त तीन तास रोज अभ्यास करणार्याचा सुंदर आणि सर्वांगीण अभ्यास होणार आहे.
असा 300 तासाचा अभ्यास करण्याने कमीत कमी तीस मार्क नक्की वाढू शकतात.वीस वर्षाचे अनुभवाने सांगतोय.
तीस मार्क वाढले तर जमीन-अस्मानाचा फरक पडतो. पुण्या-मुंबईचे उत्तम इंजीनियरिंग कॉलेज मिळू शकते.
हवी ती ब्रांच पण मिळू शकते.
याउलट कंटाळा करून, झोपा काढून शंभर दिवस घालवलेत तर कुठल्या तरी कॉलेजात जाऊन कुठल्यातरी विषयातून इंजिनीयर बनणे नशिबी येईल.
उत्तम नोकरी ,छान नोकरी ,भरपूर पगार यासाठी हे शंभर दिवस महत्त्वाचे.
मुला- मुलींनो,आई-वडिलांनो जागे व्हा.
डॉ. श्रीराम गीत.
करिअर कौन्सेलर
9960674094
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Pune
411021
Opening Hours
| Monday | 11am - 5am |
| Tuesday | 11am - 5am |
| Wednesday | 11am - 5am |
| Thursday | 11am - 5am |
| Friday | 11am - 5am |
| Saturday | 11am - 5am |