Lokvarta
12/04/2024
खेड आळंदी विधानसभेची जागा ठाकरे गटाला द्या अन्यथा..
ठाकरे गट आक्रमक, नियोजित दौरा रद्द करण्याची कोल्हेंवर नामुष्की
राजगुरूनगर : खेड तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपात खेड-आळंदी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला मिळावी, यासाठी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून शब्द द्यावा. तोपर्यंत आपल्या प्रचारात सहभागी होणार नाही. अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांना सांडभोरवाडी काळुस जिल्हा परिषद गटातील शुक्रवारी नियोजित असलेला दौरा तातडीने रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे मतदारसंघात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी पाच दिवसांपुर्वी भाजपला राम राम ठोकला. तर शुक्रवारी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्व प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती.
या प्रवेशामुळे कोल्हे यांनी देशमुख यांना विधानसभेचा शब्द दिला असावा. असे संकेत मिळत मिळाल्यानंतर ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संध्याकाळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट कोल्हे यांचं घरं गाठलं. या बैठकीत शिवसैनिकांकडील इच्छूक उमेदवारांपैकी भलतीच नावं पुढे केल्याचं समजत आहे. ही सर्व बैठक गुपित झाली. मात्र खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता कोल्हेंना आपला प्रचार थांबवण्याची नामुष्की ओढावली आहे. आता या मतदारसंघात आघाडीत निर्माण झालेला पेच कोल्हे आणि नेते मंडळी कशा पद्धतीने सोडवतात. याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच विधानसभेसाठी खेड-आळंदीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना देण्याचा शब्द वरिष्ठ नेत कार्यकर्त्यांना देणार का ? आणि तसे झाल्यास इतर पक्षातून नव्याने सामील झालेल्या इच्छुकांचे काय होणार ? याकडे आता मतदारसंघांंचं लक्ष लागून राहिलं आहे.
09/04/2024
विलास लांडेंची नाराजी दूर..! आढळरावांना मताधिक्य मिळवून देणार..
भोसरी : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास त्यांच्या ते पथ्यावर पडणार आहे. महायुतीचा धर्म पाळल्यास भोसरीतून आढळरावांना मोठे मताधिक्य मिळेल असे राजकीय गणित जाणकारांकडून मांडण्यात येत आहे.
महायुतीमधील अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूरसाठी उमेदवारी मिळेल असा आडाखा माजी आमदार विलास लांडे यांनी बांधला होता. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. या निर्णयामुळे भोसरीचे चाणक्य असलेले विलास लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली.
भोसरी विधानसभेत तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे यांची नाराजी दूर झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. सोशल मीडियावर देखील लांडे आणि आढळराव यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही चर्चा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.
'भोसरी विधानसभेत विलास लांडे यांची मोठी ताकद' :
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांना ९० हजार मते पडली आहेत. त्यांचा पराभव झाला खरा. मात्र त्यावेळी त्यांच्या राजकीय खेळ्या चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांनी अजित दादांची मनधरणी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अर्ज भरायच्या पाच मिनिटे आधीच माघार घ्यायला लावली. थेट चिन्हावर आणि पक्षावर न लढताही त्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद आपल्या बाजूने ठेवण्याची किमया केली होती. त्यांच्या या राजकीय खेळ्या अनेकांच्या अडचणीच्या ठरू शकतात याची जाणीव आढळराव पाटील यांना होती. त्यामुळे आधीच भेट घेऊन त्यांची मनधरणी करत लांडे यांची ताकद आपल्या बाजूने ठेवण्याची गरज आढळरावांना देखील निर्माण झाल्याची चर्चा आहे.
21/07/2023
महेशदादा सभागृहात नेमकं काय बोलले? पहा संपूर्ण घटनाक्रम | लोकवार्ता महेशदादा सभागृहात नेमकं काय बोलले? पहा संपूर्ण घटनाक्रम | लोकवार्ताThank You for watchingTo create news we use below products Camera :-R6https://amzn.to/3tDn...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Moshi Spine Road
Pune
412105