CircleNews
07/02/2026
“शेवटचा फोन”
रात्रीचे २:१७ वाजले होते. मोबाईलची स्क्रीन उजळली
“आई कॉल करत आहे…” आरव दचकला.इतक्या रात्री? त्याने फोन उचलला. “हो आई?” पलीकडून आवाज आला—हळू, थकलेला, पण तोच ओळखीचा मायेचा. “बाळा… झोपला नव्हतास का?” “नाही गं आई, काम होतं. तू बरी आहेस ना?” थोडा वेळ शांतता.
मग आई म्हणाली “आज तुझी खूप आठवण येत होती.”
आरव हलकंसं हसला. “आई, कालच तर बोललो होतो.”
आई हसली—त्या हसण्यात आयुष्याची थकवा होता.
“माय आहे रे… मन कधीच भरत नाही.”
थोड्या गप्पा झाल्या जेवणाबद्दल, तब्येतीबद्दल, लहानपणीच्या आठवणी.
आई म्हणाली “लहानपणी ताप आला की माझ्या पदरात तोंड लपवून झोपायचास आठवतय?” आरवचे डोळे पाणावले. “सगळं आठवतंय आई.” अचानक आई म्हणाली “आरव मी जर एक दिवस नसेन तर” “आई!”
आरव घाबरला. “असं बोलू नकोस.” आई शांतपणे म्हणाली “अरे वेड्या… प्रत्येकाला जायचंच असत.
पण एवढंच लक्षात ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे.”फोन कट झाला. आरव थोडा वेळ मोबाईलकडे पाहत राहिला. मग झोपून गेला. सकाळी ६ वाजता दाराबाहेर गडबड झाली, फोन वाजला.
“आरव… आईची तब्येत रात्री अचानक खूप बिघडली
ती आपल्याला सोडून गेली” जग थांबल.
आरवचा हात थरथरला, मोबाईल खाली पडला.
त्याला आठवल रात्रीचे २:१७. आईचा आवाज.
आईचं हसू आईचं “मी नसेन तर…”
तो फोन तोच शेवटचा फोन होता.
आईला माहीत होत मुलाच्या आयुष्यातून जाण्याआधी,
तिला एकदा तरी “बाळा” म्हणायच होत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune