GDC ACADEMY
18/02/2025
१ फेब्रुवारी १६८९:- संभाजी राजांना संगमेश्वर येथे मोगलांकडुन छापा घालून कैद करण्यात आले.
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला. त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे.
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला. त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धसका, जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या सरदारांनी घेतली होती, तेवढाच धसका अगर भीती छत्रपती संभाजी महाराजांचीही औरंगजेब व त्याच्या पराक्रमी म्हणवल्या जाणा-या सेनापती व सरदारांनीही घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठयांचे राज्य आपण चुटकीसरशी सहजपणे जिंकतो. असे मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होते. त्यासाठी इ.स. १६८२ मध्ये मोठया इर्षेने ७ लाखांची फौज घेऊन तो महाराष्ट्रात आला होता. या लढयात त्याने आपले तीनही मुलगे शाहजादा मुअज्जम, शाहजादा आज्जम,सुल्ताना कामबक्ष,नातू तसेच अनेक अनुभवी मातब्बर सरदार उतरवले होते. त्यावेळी केवळ ५० हजाराचे सैन्यबळ असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीने मुघलांच्या त्या आक्रमणाशी झुंज दिली, ती अतुलनीय अशीच होती. संभाजी राजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी योजना आखण्यासाठी औरंगजेबाने शाही दरबार बोलवला. त्या दरबारात औरंगजेबाने आपल्या प्रमुख सरदारांकडे संभाजी राजांच्या विरोधात लढण्याची मोहिम त्या सरदारांकडून कोणीतरी स्वीकारावी यासाठी प्रस्ताव ठेवला. परंतु महापराक्रमी संभाजी राजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायला औरंगजेबाच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे आला नाही.त्यावेळी संताप अनावर झाल्याने औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमॉश (पगडी) काढून फेकून दिला आणि संभाला पकडल्याशिवाय डोक्यावर किमॉश चढविणार नाही अशा प्रतिज्ञा केली. ८ वर्षे ८ महिने छत्रपती संभाजी राजे कायम रणांगणावर मुघलांच्या सैन्याशी लढत होते. एवढा अद्भुत पराक्रम त्यांच्या अंगी होता. त्याकाळात ७ वर्षे औरंगजेब आपल्या दरबारात डोक्यावर किमॉश न घालता बोडका होऊन बसत असे. त्याकारणाने त्याच्या मनातील छत्रपती संभाजी राजांबद्दलचा द्वेष खदखदत होता.
इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड, वादुस, दहिवडी, फलटण, बारामती, कुरकुंभ, दौंड मार्गे पेडगाव, ता.श्रीगोंदा येथील किल्ल्यावर आणले. त्याच दरम्यान औरंगजेबाची छावाणीही अकलूज वरून ती किल्ल्या जवळील खंडोबाच्या माळावर सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली या छावणीत सुमारे आठ लाख सैनिक व जनावरे असा लवाजमा संगती होता.औरंगझेबाला ही खबर देण्यात आली,”हुजुर,संभा कैद हो गया”
मात्र प्रथम औरंगझेब भडकला आणि आल्या हेराला औरंगझेब म्हणाला,”क्या बकते हो? पीके तो नहीं आये? संभा गिरफ्तार हो गया?”
“हां हुजुर,संगमेश्वरी मुकर्रबखानने दस्त कर लिया उन्हें……”
त्याच क्षणी औरंगझेबने फरमान सोडले,” लाया जाय उसे शानो शौकत से…..त्याला पोलादी साखल दंडानी जखडवा,उन्टाला बांधा,विदुशकी झबली घाला,घुंगर असलेली टोपी अड़कवा त्याच्या डोक्यात……आणि वाजत-गाजत धिंड काढा त्याची..! समजू द्या या महाराष्ट्राला की औरंगझेबाने कैद केलाय संभाजीला….! “
त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला’ म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल’, असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.
शेवटी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या’, असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना बखरकारांनी खुपच बदनाम केलेले दिसते.शिवाजीराजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही. तेंव्हा राजांनी काशीवरुन गागा भट्टांना आणुन राज्याभिषेक पार पडला. सहाजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचे बलिदान अडगळीत टाकुन त्यांना बदनाम करण्याची मोहिम सातत्याने चालुच ठेवली.संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते.संभाजी राजांवर जो अमानुष प्रयोग केला जायचा त्याची रंगीत तालीम औरंग्या कवी कलशांवर करायचा जेणेकरुन कवी कलशांचे हाल पाहुन संभाजी राजे गहीवरुन शरण येतील परंतु जीवलग मित्रांना वेगळे करुन पाहिले, आमिषे दाखविली व शेवटी अनेक अन्वित अत्याचार केले गेले प्रसंगी जीव दिला परंतु कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजी राजांशी ईमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भुमीवर संभाजी राजांच्या अगोदर दिले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्युलाही सामोरे जाणार्या कवी कलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील.
संदर्भ – विनीत यांच्या ब्लॉगवरून काही भाग घेतला आहे.
18/02/2025
गोपाळ हरी देशमुख (1823-1892) हे एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना 'लोकहितवादी' या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी 1848 पासून 'प्रभाकर' या वृत्तपत्रात *'लोकहितवादींच्या 108 पत्रां'*च्या माध्यमातून समाजसुधारणा, स्त्री-शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि विज्ञानवादी दृष्टिकोन याविषयी लेखन केले. ✍️📖
कार्य:
1. सामाजिक सुधारणा: समाजातील अनिष्ठ प्रथा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता याविरोधात लेखन आणि जनजागृती. 🚫🌍
2. स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार: त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा आग्रह धरला आणि बालविवाह, सतीप्रथा याविरोधात आवाज उठवला. 📚👩🎓💡
3. शेती सुधारणा: त्यांनी आधुनिक शेतीचे महत्त्व सांगितले आणि शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. 🌾🚜
4. पत्रकारिता आणि लेखन: त्यांनी 'प्रभाकर', 'ज्ञानोदय', 'इंडिक टाइम्स' यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये सामाजिक विषयांवर लेखन केले. 📰✒️
5. प्रार्थना समाज: ते महादेव गोविंद रानडे आणि इतर समाजसुधारकांसोबत प्रार्थना समाजाशी संबंधित होते. 🙏🌟
गोपाळ हरी देशमुख यांनी समाजसुधारक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले आणि महाराष्ट्राच्या विचारसरणीवर अमीट छाप सोडली.
- GDC Sir
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
GDC ACADEMY, Opt. Bhagini Nivedita Bank, Anand Nagar, Old Sangvi
Pune University
411027
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 5pm |
| Friday | 10am - 5pm |
| Saturday | 10am - 6pm |