Swapnil Jadhav

Swapnil Jadhav

Share

19/02/2021

पहिल्या चार छत्रपतीनंतरच्या छत्रपतींचे काय झाले...???

🙏🙏🙏🙏🙏शिवजयंती साजरी करताना आपण महाराजांनी केलेल्या कार्याचे खरच स्मरण करतो का ? याबद्दल शंका वाटते. आपल्याला एखादी अडचण आली तरी आपली दमछाक होते. महाराजांनी तर शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या तीन राजवटींचे राज्य दख्खनवर होते आणि उत्तरेला मुघल. त्यात भर म्हणजे वडील शहाजीराजे ज्याच्याकडे जहागीरदार म्हणून आहेत त्यांच्याच राज्यांवर हल्ले करून स्वराज्य स्थापन करायचे. हे सर्व खरच वाटतं तेवढं सोप्प होतं का ? अजिबात नाही.
बहुतेक जणांना तर महाराजांच्या जीवनाचा कालानुक्रमसुद्धा सांगता येणार नाही. एवढेच काय राजमुद्राही कुणाला पाठ नसेल..😞 त्यापुढचा प्रश्न म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज,राजाराम महाराज आणि शाहू महाराज यानंतरचे छत्रपती कोण होते ?🤔... ते होते तर छत्रपतींपेक्षा पेशवेपद एवढं महत्वाचं का बरं झालं ?🤔.. यापैकी कुठलाही प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. प्रश्न पडत नाहीत कारण आपली विचार करण्याची तयारीच नाही. महाराज इतिहास घडवू शकले कारण भारताच्या पूर्वइतिहासावर त्यांनी खूप चिंतन केले होते आणि म्हणूनच ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकले. बाराव्या शतकाच्या शेवटी पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला अभय दिलं होतं आणि नंतर याच घोरीने पृथ्वीराजचा खात्मा केला. यावरून शिकलेले हाताशी आलेल्या शत्रूला कधीही सोडायचे नसते हे तत्व महाराजांनी आयुष्यभर पाळले..🔥 शाहूमहाराजानंतर छत्रपतीपदाचं महत्व कमी झालं कारण इतिहासाचे चिंतन करणेच सोडून दिले गेले होते....
१६८९ मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी येसूबाई आणि युवराज शाहूराजे औरंजेबाच्या कैदेत होते. तब्बल अठरा वर्षे म्हणजेच १७०७ पर्यंत. तोपर्यंत स्वराज्याची धुरा सांभाळली छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १७०० नंतर महाराणी ताराबाई यांनी. परंतु १७०७ मध्ये शाहूमहाराजांची सुटका होऊन ते महाराष्ट्रात परत आले. त्यांना सोडणे ही औरंगजेबाची एक राजकीय खेळीच होती आणि घडलेही तसेच. शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांच्यात आणि महाराणी ताराबाई यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला⚔⚔. यामध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या पाठिंब्यामुळे शाहूमहाराज साताऱ्याच्या गादीवर बसले आणि छत्रपती बनले👑👑. परंतु महाराणी ताराबाई इथेच थांबल्या नाही. त्यांनी कोल्हापूरला छत्रपतींची दुसरी गादी स्थापन करून त्यावर त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा यांना बसविले. पण छत्रपती म्हणून सर्वमान्यता साताऱ्याच्या गादीलाच म्हणजेच शाहूमहाराजांनाच होती. शाहूमहाराजांना युद्धभूमीचा अनुभव नसल्यामुळे ती जबाबदारी पेशवे आणि सेनापती यांनी सांभाळली🤞. कधी कधी तर पेशव्यांच्या सल्ल्याशिवाय त्यांना निर्णय घेणे कठीण जात असे. त्यामुळे साहजिकच पेशव्यांचा दरबारात दबदबा वाढत गेला. शाहूमहाराजांचा मृत्यू १६४८ मध्ये झाला. शाहू महाराजांना मुलं नव्हते म्हणून गादीचा वारसदार म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचे नातू रामराजा यांना दत्तक घेतले होते. परंतु त्याअगोदर रामराजा यांना कधी कुणी बघितले नव्हते. महाराणी ताराबाई यांनी एकदमच रामराजा यांना आपला नातू म्हणून प्रकट केले होते. एवढे दिवस ते कुठे होते या प्रश्नाला त्यांनी असे उत्तर दिले की सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना राजपुतांकडे ठेवण्यात आले होते🧐. हे कारण शाहू महाराजांनी स्वीकारले आणि रामराजा यांना दत्तक घेतले. शाहू महाराजांनंतर ते स्वराज्याचे पाचवे छत्रपती बनले.
महाराणी ताराबाई यांची सत्तेची आस अजूनही संपलेली नव्हती. त्यांना छत्रपती फक्त नामधारी हवा होता आणि सत्ता स्वतःला चालवायची होती. पण त्यांच्या या विचारामध्ये प्रमुख अडथळा पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच पेशवे नानासाहेब यांचा होता. म्हणून त्यांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढून टाकण्यास छत्रपती रामराजा यांना सांगितले. परंतु रामराजे यांनी त्यास नकार दिला. तेव्हा महाराणी ताराबाई यांनी रामराजा स्वतःचा नातू नसल्याचे जाहीर केले आणि त्यांना छत्रपतीपदावरून पदच्युत केले व कारभार स्वतःच्या हाती घेतला🙄🙄. या सर्व प्रकारामुळे महाराणी ताराबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्यात युद्धं झाले⚔⚔. त्या युद्धात महाराणी ताराबाईंचा पराभव झाला. त्यानंतर नानासाहेब पेशवे आणि ताराबाई यांच्यात तह होऊन ताराबाईंनी पेशव्यांचे प्रभुत्व मान्य केले🤝. तह पाळण्याबद्दल दोघांनी जेजुरीच्या मंदिरात शपथ घेतली. त्याचवेळेस महाराणी ताराबाई यांनी शपथेवर रामराजा त्यांचे नातू नसल्याचे सांगितले. तरीही त्यापुढे म्हणजेच १७५२ नंतर रामराजा यांनाच नामधारी छत्रपती म्हणून गादीवर बसविले गेले आणि सर्व राज्यकारभार पेशव्यांकडे आला.
त्यानंतर छत्रपतीपद हे फक्त नामधारी राहिले आणि मराठा साम्राज्य पेशव्यांमार्फत चालविले जाऊ लागले.....🙏🙏🙏

Want your school to be the top-listed School/college in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Nashik