Humanity For Future Foundation
२००४ साली गुरुदीक्षा घेऊन सत्संगात जायला सुरवात केली. आम्ही अध्यात्मात नवखे होतो , तसा आमचा गुरूसुद्धा नवखाच होता. म्हणजे हा "गुरु बिजनेस" सुरु करून त्याला चार पाच वर्षेच झाली होती. पण तो नवखा असूनही खूप "चालु" होता. चलाख होता. मॉब सायकोलॉजी कशी मॅनिप्युलेट करायची, ब्रेनवॉश कसा करायचा ह्याचं त्याला उत्तम ज्ञान होतं . अर्थातच ते असल्याशिवाय तुम्हाला कल्ट लीडर होताच येत नाही.
त्याचा "स्टार्टअप" नवानवा असल्याने त्याच्यापाशी जास्त फंड नव्हता. अल्पशा भांडवलातून (तेही देणगीच्या पैश्यातून ) त्याने पुण्याच्या रहाटणीत एक दोनेक एकरच्या प्लॉटमध्ये आपला आश्रम थाटला होता. आश्रमही अगदी मिनिमलिस्ट सुविधायुक्त होता. फक्त एक सत्संग-हॉल अन एक भोजनकक्ष एवढंच. तिथे मुक्काम करण्याची सोय नव्हती. म्हणून मग बाहेरगावाहून आलेल्या साधकांची राहण्याची सोय तिथल्या स्थानिक साधकांच्या घरी किंवा पुण्यात त्यांच्याच संस्थेच्या विविध सेंटर्सवर केली जायची. पण ती सोय अगदीच जेमतेम असायची. फार तोटक्या सुविधांमध्ये अड्जस्ट करावं लागायचं. पण हे सगळं तुम्हाला विनातक्रार स्वीकार करायचं आहे अशी गुरुआज्ञा होती. म्हणजे तुम्ही ज्ञानप्राप्तीसाठी तयार आहात कि नाही हि तुमची परीक्षा आहे असं फ्रेम करून नीट पटवून दिलं जायचं. मग आता तुम्हाला कसंही खायला दिलं , कुठंही झोपायला दिलं , आंघोळीला पाणी गरम असो थंड असो , तुम्ही ते विनातक्रार "स्विकार" करणे अनिवार्य आहे. तुम्ही तक्रार केली म्हणजे तुम्ही कच्चे शिष्य / साधक आहात . मी कच्चा नाही पक्का साधक आहे हे सिद्ध करण्यासाठी मग तुम्ही गु खायलाही तयार होता.
तप , समर्पण , सहिष्णुता , स्वीकारभाव , सहनशीलता ह्या गुणांना धर्मक्षेत्रात आतोनात महत्व दिल्या जातं .
ह्या क्वालिटीज अंगी असतील तर तुम्ही ज्ञानप्राप्तीसाठी तितके अधिक पात्र आहात असा अर्थ होतो. ज्ञानप्राप्तीसाठी तुमची योग्यता आहे कि नाही हे उपरोक्त निकषांच्या आधारावर ठरवलं जातं . एकंदरीत , तुम्ही तुमच्या कंफर्टझोन मधून बाहेर पडायला तयार आहात का हीच तुमची खरी परीक्षा असते. ह्या क्वालिटीजमध्ये तुम्ही कमी पडलात तर तुमच्यात अहंकार भरला आहे असा अर्थ काढला जातो. आणि ज्ञानप्राप्तीत सर्वात मोठी बाधा म्हणजे "अहंकार". ह्या अहंकाराचेही ठळक आणि सूक्ष्म असे प्रकार असतात. वरवर स्पष्ट दिसून येणारा अहंकार स्थूल .. आणि म्हणून ओळखायला सोपा .
सूक्ष्म अहंकार अधिक चॅलेंजिंग मानला जातो. अनेक साधक वरवर अध्यात्मिक ढोंग पांघरून घेतात. वेशभूषा , वर्तन , बोलणं हसणं सात्विकतेने सजवून घेतात . पण सूक्ष्म अहंकार त्यांना लपवता येत नाही. हा सूक्ष्म अहंकार सर्वांना पकडताही येत नाही. तो पकडण्यासाठी खोल अभ्यास असायला हवा.
कोणाची किती अध्यात्मिक प्रगती झाली आहे हे तो किती अहंकाररहित झाला आहे ह्यावरून ठरवलं जातं .
पण गमतीशीर गोष्ट काय आहे माहित्ये का ? मी अहंकारशून्य झालो आहे हे इतरांना दाखवण्याची एक वेगळीच धडपड , एक वेगळीच भूक ह्या साधकांच्या वागण्यात झळकायला लागते. हे त्यांच्या लक्षात येतच नाही.
अर्थातच सगळेच साधक धूर्त अन पाखंडी नसतात. अगदी बोटावर मोजता येईल असे अपवाद असतात जे खरोखरच निरागसतेने प्रामाणिक वाटचाल करीत असतात. भाबडे असतात.
"मी अहंकाररहित होणार" हि इच्छाच मुळात अहंकारातून जन्म घेत असते. हि इच्छाच एक मोठा अहंकार आहे.
आणि ह्यावरच सगळं ढोंग उभं आहे.
वेळोवेळी तुमच्या अहंकाराच्या चाचण्या घेतल्या जातात. ह्या चाचण्या म्हणजे तुमची लिटमस टेस्ट असते.
तुम्ही किती आज्ञाकारी झाला आहात हे चेक केल्या जातं . आज्ञाकारी व्यक्तीकडून काहीही करवून घेता येऊ शकतं . म्हणून आज्ञाकारी व्यक्ती गुरुजनांना प्रिय असतात.
तुम्ही किती आज्ञाकारी आहात अर्थात किती "बैल" आहात ह्यावरून तुमचे अध्यात्मिक मूल्य ठरत असते. आपले मूल्य वाढीव ठरवण्यासाठी तुम्ही "अल्ट्रा प्रो मॅक्स बैल" होता. तुम्हाला वाटते असे होऊन तुम्ही गुरूंच्या.. पर्यायाने देवाच्या गुडबुक्स मध्ये स्थान पटकवाल आणि रिवॉर्ड म्हणून तुम्हाला मोबदल्यात ज्ञान मिळेल मोक्ष मिळेल. निव्वळ सौदेबाजी !
ह्या सौदेबाजीमुळेच माणूस गटारात डुबक्या मारायला तयार होतो. लिंग छाटून घ्यायला तयार होतो. जन्नत मध्ये जागा मिळेल म्हणून आतंकवादी व्हायला तयार होतो. कसाब सारखा मरायला तयार होतो. शेण खायला तयार होतो. स्मशानातले मुडदे उकरून खायला तयार होतो. स्वतःची द्यायलाही तयार होतो.
(आता त्या गुरूंचं पुण्यात 25 एकरात भव्य दिव्य आलिशान आश्रम आहे. ही आहे बैलत्वाची ताकत 😀)
✍️ DrVijay Randive
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
Mumbai
400076