Abhay Tendulkar
31/03/2026
*आज भगवान महावीर जयंती...*
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात इ. स. पूर्व ५९९ साली झाला, असे जैन धर्मीय मानतात. भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली.
भगवान महावीर यांचा जन्म अशा काळात झाला, जेव्हा हिंसाचार, पशुबळी, जातीय भेदभाव शिगेला पोहोचला होता. यातूनच त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सांसारिक मोह आणि राजवैभवाचा त्याग केला होता. १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, असेही मानले जाते. भगवान महावीरांनी मानवाच्या उन्नतीसाठी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्त्वांविषयी सांगितले.
सत्य आणि अहिंसा हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. अपरिग्रह म्हणजेच विषय किंवा वस्तूची आसक्ती न राहिल्याने माणूस ऐहिक आकर्षणाचा त्याग करून अध्यात्माच्या मार्गावर अखंड चालतो. ब्रह्मचर्य पाळणाऱ्या व्यक्तीला आपल्या इंद्रियांवर सहज नियंत्रण मिळते. या पंच तत्त्वांमुळे व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.
भगवान महावीरांना जयंतीनिमित्त शतश: नमन...
#भगवान_महावीर #जैन_धर्म #२४वे_तीर्थंकर #जयंती #प्रणाम #पंचतत्त्वे
12/03/2026
आपल्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या हितासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Plot No 116 Salokhe Nagar Kalamba Road Kolhapur
Kolhapur
416007