Karvir Riyasat
29/04/2024
कोल्हापूरचे दत्तक प्रकरण नेमके खरे काय ? विद्यमान शाहू छत्रपती महाराज हे खरे वारसदार आहेत की नाही ?
कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपती महाराज हे लोकसभेच्या रिंगणात उभे राहिल्याने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांच्या विरोधकांकडून जवळपास ६५ वर्षांपूर्वी घडलेले दत्तक प्रकरण उकरून काढून विद्यमान छत्रपतींच्या वारसांच्या खरेपणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. वास्तवाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी विरोधक हे प्रकरण त्यांच्या सोयीने रंगवून सांगत आहेत. मात्र सत्य इतिहास समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेखनप्रपंच...
आपण घटनाक्रम समजून घेऊ. संजय मंडलिक यांनी सर्वप्रथम दावा केला की शाहू छत्रपती महाराज हे दत्तक असल्याने छत्रपतींचे थेट वारसदार नाहीत. त्यानंतर त्यांनी पद्माराजे कदमबांडे यांचे पुत्र राजवर्धन कदमबांडे यांना आता खरे वारसदार म्हणून उभे केले आहे.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज हे सुद्धा छत्रपतींच्या गादीवर दत्तक आलेले होते. म्हणून ते सुद्धा छत्रपतींचे खरे वारस ठरत नाहीत, असेच मंडलिक यांचे मत असावे. आता राजवर्धन कदमबांडे हे खरे वारसदार असल्याचा दावा करतात, ते कसे हे आपण पाहू. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना पद्माराजे या कन्या होत्या. त्यांचे पुत्र या नात्याने कदमबांडे हे स्वतःस शाहू महाराजांचे वारसदार म्हणवून घेतात आणि याचाच आधार घेत मंडलिक आणि चंपू विद्यमान शाहू छत्रपती महाराज हे खरे वारसदार नाहीत असा दावा करत आहेत.
विद्यमान श्री शाहू छत्रपती महाराज हे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे सख्खे नातू असणारे कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचे पुत्र आहेत. ज्यापद्धतीने राजर्षी शाहू महाराज हे मुलीकडील नात्याने छत्रपती घराण्यात दत्तक आलेले होते, त्याच प्रमाणे छत्रपती शहाजी महाराजांनी मुलीचा मुलगा या नात्याने विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना दत्तक घेतले आहे. जन्माच्या व दत्तकाच्या अशा दोन्ही नात्याने विद्यमान शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे "सख्खे" पणतू लागतात.
राजाराम महाराजांच्या मुलीचे पुत्र असणारे कदमबांडे हे मात्र छत्रपतींचे खरे वारसदार पण शहाजी महाराजांच्या मुलीचे पुत्र आणि राजर्षी शाहू महाराजांचे नात्याने सख्खे पणतू असणारे विद्यमान शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत, असा बालिश दावा विरोधक करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यशील गादीचा अवमान करत आहोत, याचे भान विरोधक ठेवत नाहीत, हे दुर्दैवी आहे !
छत्रपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आज प्रभू श्री राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
14/01/2023
स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची राजमुद्रा l
शिवपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे पुत्र, हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती क्षत्रियकुलावतंस श्री शिवछत्रपति महाराज यांची मुद्रा.
" श्री l प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ll रामसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "
श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर महाराणी ताराबाईंनी आपले पुत्र शिवाजीराजे यांस गादीवर बसवून सात वर्षे स्वराज्याचा कारभार पाहिला. या काळात सर्व पत्रव्यवहार छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाने व राजमुद्रेने केला जायचा. राजाराम महाराजांनंतर गादीवर येणारे ते स्वराज्याचे चौथे छत्रपती होते.
04/01/2023
छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर हे पुरोगामी की हिंदुत्ववादी ?
कोल्हापूरमध्ये नुकत्याच निघालेल्या हिंदू आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना कोल्हापूरातीलच एका हुश्शार पत्रकाराने वरील प्रश्न विचारला. मुळात हा प्रश्नच किती निरर्थक व निर्बुद्ध आहे, हे जाणत्या लोकांच्या निश्चितच लक्षात येईल. कहर म्हणजे सर्व माध्यमांवर या मोर्चाबाबत अशा दृष्टिकोनातूनच चर्चा सुरू आहे.
छत्रपती शाहू महाराजांचे कोल्हापूर एकतर पुरोगामी म्हणून ओळखले जाते, मग ते हिंदुत्ववादी कसे झाले ? असा मूर्खप्रश्न या फुरोगाम्यांना पडला आहे. यावरून फुरोगाम्यांना "पुरोगामी" या शब्दाची व्याख्याच नीट माहीत नाही, हे स्पष्ट दिसते.
या लेखनप्रपंचाचा उद्देश हा मोर्चा किंवा मोर्चामधील मागण्या नसून या मोर्चामुळे फुरोगाम्यांना उठलेला पोटशूळ शमवणे व धर्मनिष्ठ शिवशाहू भक्त कोल्हापूरकरांचा संभ्रम दूर करणे, हा आहे !
तर या हुश्शार पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ असा निघतो की राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी होते पण हिंदुत्ववादी नव्हते, किंबहुना पुरोगामीत्व आणि हिंदुत्व या दोन विरूद्धार्थी संकल्पना आहेत ! पण युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रश्नाला दिलेल्या उत्तरातूनच फुरोगाम्यांचा पक्षपातीपणा व हिंदूधर्म द्वेष उघड होण्यास सुरूवात होते. युवराजांनी उत्तरात सांगितले की, "छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात शिवाजी महाराजांच्या नावाने वैदिक शिक्षण देणारी शाळा सुरू केलेली होती, ती का केली असेल त्याचे कारण शोधा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल !"
हिंदू धर्माविषयी प्रेम नसणारा कोणता राजा वेदांचे शिक्षण देणारी शाळा सुरू करेल ? राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वर्धमाभिमानी होते. आपल्या हिंदू धर्माविषयी त्यांना प्रचंड आस्था, आदर व अभिमान होता. आपल्या दैवतांविषयी त्यांच्या मनात पूज्यभाव होता. धर्मातील अनिष्ट प्रथा व देवपूजेची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेले कार्य हे सनातन्यांनी हिंदू धर्मावर चढविलेली अनिष्ट पुटे पुसून टाकून हिंदुत्वाला उज्ज्वल बनविण्यासाठीच होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अनेक मंदिरे उभारली, पुरातन मंदिरांचे जीर्णोद्धार केले, अनेक मंदिरांना त्यांनी शेकडो एकर जमिनी दान दिल्या. स्वतः महाराज नित्यनेमाने अंबाबाई व भवानी मातेच्या दर्शनास जायचे. ते महादेवाचे निस्सीम भक्त होते, याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. महाराज भल्या पहाटे पंचगंगेमध्ये कार्तिक स्नानासाठी जायचे. वेदोक्त प्रकरण हे कार्तिक स्नानावेळीच उद्भवले होते, हे दुर्लक्षून चालणार नाही. वेदोक्त प्रकरण घडले म्हणून महाराजांनी कार्तिक स्नानाची धार्मिक परंपरा किंवा हिंदू धर्म सोडला नाही, तर वैदिक शाळेची स्थापना करून धर्मात सुधारणा घडवून आणली, हे लक्षात घेतले पाहिजे.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात गोहत्या बंदीचा कायदा केला होता. धर्मपरिवर्तन झालेल्या अनेक हिंदूंना त्यांनी स्वधर्मात परत घेतले ; श्री शाहू दयानंद हायस्कूल मध्ये यासाठी नित्य यज्ञच सुरू असायचा. डाव्या विचासरणीच्या पक्षपाती इतिहासकारांनी हा सर्व इतिहास नेहमीच अंधारात ठेवला आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना चक्क निधर्मी "कम्युनिस्ट" करून टाकले !
म्हणूनच आजच्या उसण्या अवसानाच्या "घरभेदी" पत्रकारांना, पक्षपाती फुरोगाम्यांना महाराजांचं कोल्हापूर पुरोगामी की हिंदुत्ववादी, असे बाष्कळ प्रश्न पडतात.
स्वत:च्या धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरांना चिटकून न राहता वेळोवेळी धर्मात सुधारणा घडविणारा, धर्मग्रंथातील पुरातन नियमांपेक्षा संविधानातील कायद्यांना अधिक मानणारा, सुधारणावादी, विज्ञानवादी, सहिष्णू, संस्कृती जपून आधुनिकतेची आस धरणारा असा राष्ट्रप्रेमी पुरातन हिंदू धर्मच खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उज्ज्वल वारसा जपणारे, आपल्या राजमुद्रेची सुरूवात श्री महादेव व श्री तुळजाभवानीच्या अभिवादनाने करणारे आणि आपल्या नावापुढे हिंदूंचे सार्वभौम महाराज - "हिंदूपदपातशहा" हे बिरूद अभिमानाने लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खरे हिंदूत्व जपणारे "पुरोगामी हिंदुत्ववादी" होते.
आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगणे, धार्मिक कर्तव्ये पार पाडणे, दैवतांप्रती पूज्यभाव ठेवून धर्मोद्धाराचे आचरण करणे हे छत्रपतींनीच आपल्या कार्यातून शिकविले आहे. यामध्ये गैर काहीच नाही. इतर धर्मियांनी या बाबी केल्या तर फुरोगाम्यांना काहीच अडचण नसते. पण हिंदू धर्मियांनी स्वधर्माचे नाव जरी उच्चारले तरी ते "सनातनी, प्रतिगामी" ठरविले जातात. दुर्दैव म्हणजे खुद्द छत्रपतींनाच त्यांना यासाठी वापरावे लागते. पण आपण आता यांच्या कोणत्याही कथनावर अवलंबून न राहता स्वतः छत्रपतींचा हा सत्य इतिहास वाचणे, त्याचे आकलन करणे व प्रसार करणे हेच उचित आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Address
Kolhapur