Paryatan Mitra
13/05/2020
पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....
पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित
सिद्धाच्या प्राचीन गुहा
भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील भटवाडीच्या शेजारील सिद्धाच्या डोंगरांमध्ये असणाऱ्या प्राचीन गुहा पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिल्या आहेत. या गुहेमध्ये असणाऱ्या शिवलिंग मंदिराचा(सिद्धनाथ) विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.
पाटगावपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर ताब्यांची वाडी उर्फ भटवाडी गावाच्या उजवीकडे दूरवर आकाशात घुसलेल्या गर्द अरण्याने लपेटलेल्या डोंगरास सिद्धास डोंगर म्हणून ओळखले जातो. पाटगाव धरणक्षेत्रातील पुनर्वसन झालेल्या ग्रामस्थांचा हा सिध्ददेव असून या डोंगरावर एकमेकाला लागून तीन गुहा आहेत. घनदाट जंगल, गर्द वनराई आणि सपाट मैदान पाहून मन भारावून जाते. कडक उन्हाळ्यातदेखील येथील हवामान थंडगार असते. रांगणा किल्ल्याकडे जाणारे कवचितच पर्यटक या गुहेकडे भेट देतात.
गुहेच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी पंधरा ते वीस फूट खाली पायऱ्या उतरून जावे लागते. मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाची पिंड व अनेक त्रिशूल आहेत. या गाभाऱ्याची उंची बारा फूट इतकी आहे. लांबी वीस, तर रुंदी बारा फूट इतकी आहे. यामध्ये आणखी लहान-मोठया आकाराच्या पाच गुहा आहेत. यांपैकी पहिली गुहा तीस फुटांपर्यंतच आहे. दुसरी 55 फूट लांब आहे. तिसऱ्या गुहेला डाव्या-उजव्या बाजूला अनेक मार्ग फुटलेले आहेत. त्यातूनच हा मुख्य मार्ग नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. हा मार्ग वेडीवाकडी वळणे घेत गेलेल्या आहे. गुहेमध्ये आत सरकेल तसा मार्ग चिंचोळा होत गेला आहे. गुहा वेडीवाकडी असल्यामुळे हवाही कमी प्रमाणात आत येते. गुहेच्या मुख्यावर महादेवाची पिंडी आणि त्रिशूल आहे; त्यामुळे याला सिद्धनाथ असे नाव देण्यात आले. या देवाची वर्षातून दोन वेळा यात्रा होतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री दिवशी पाटगाव, भटवाडी, शिवडाव येथील भाविक या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात हा सण दोन दिवस साजरा करतात. त्यानंतर एरवी हा भाग निर्जन राहतो. या परिसरात रानागवा, अस्वल, बिबट्या, साळीदर, विषारी साप यांचा वावर असतो. गुहेत वटवाघूळ आणि वन्यप्राण्यांचा वावर असल्याने उग्र वास येतो. या तीन गुहांतील मार्गांची माहिती घेतली असता या गुहा शिवकालीन असून, यातील एक मार्ग रांगणा किल्ल्याकडे जात असल्याचे सांगाण्यात आले. या गुहेमध्ये पडझड झाल्याने 50 फूट अंतर गेल्यानंतर मार्ग बंद झाला आहे; त्यामुळे या गुहांचे जतन करावे अशी मागणी जीत फौंडेशनचे अध्यक्ष सुनील धोंड यांनी केले आहे.
सिद्ध गुहा ह्या बुद्धकालीन गूढ रम्य, निसर्गसौंदर्याने रमणीय अशा आहेत. मुळात ह्या दक्षिणाभिमुख. महादेवाचे दैवी अधिष्ठान असल्याने येथील जंगलसंपदा सुरक्षित आहे. व्यसनी विक्रुतीला इथं थारा नाही. अशा पावित्र्यामुळे जंगल आणि पिढी सुरक्षित राहील.
-दत्ता मोरसे,
जंगल संशोधन.
ग्रुप ट्रेकिंग .. वन डे ट्रेक साठी खूप छान असे पर्यटन स्थळ आहे.
अधिकमहिती साठी संपर्क साधा
अभिजीत लोखंडे, कोल्हापूर.
9011234999
11/05/2020
पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....
महाबळेश्वरातलं स्वर्गतुल्य मिनी काश्मीर
राधेय ऍग्रो रिसॉर्ट.....
'चलते रहेना ही जिंदगी का नूर हे..
पर क्या करे, वक्त की पाबंदी से मजबूर है…
युरोप रशिया तो क्या
अपने लिए कश्मीर भी बहोत दूर है..'
वेळेची बांधीलकी पावलांमध्ये बेड्या बनून राहते आणि मग ती पावलं अडखळतात अर्ध्या वाटेवरच. जायचं असतं खूप दूर; पण… केवळ स्वप्नंच उरता… अशा स्वप्नाळू जीवांसाठी आपल्या मातीत अवतरलेय साक्षात काश्मीर. अहो म्हणजे अगदी आपल्या महाबळेश्वरच्याच सावलीत.. म्हणजे फक्त सोळा किलोमीटर.. ते आहे राधेय ऍग्रो टुरिझम वाटंबे.
राधेय ऍग्रो रिसॉर्ट पार्क. कॉटेज, वूड हाऊस, टेंट हाऊस, गार्डन रेस्टोचे परिपूर्ण विणलेले नंदनवन म्हणावे. कँप फायर, व्हॉलीबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, कबड्डी, क्रिकेट ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, स्ट्रॉबेरी फार्म, डी.जे., कराओके, रिव्हर कँप, ट्री ब्रीज अशा भरगच्च ओयी आणि ट्रेकिंग, हँगिंग ब्रीजचा थरार.. स्टे इन इग्लु टेंट, आर्मी टेंट, रूम्स, व्हेज नॉनव्हेज फुडस.. बाजूला महाबळेश्वरचा मनमोहन देखावा व लिंगमळा वॉटर फॉल म्हणजे 'आनंदाचे डोही आनंद तरंग'.
महाबळेश्वरला मेढामार्ग जाताना सातारा-मेढा मार्गावरच लागतो केळघर घाट. या घाटात काळ्या कड्याच्या पायथ्याशी पंधरा किलोमीटरवर वसले आहे वाटंबे गाव. म्हणजे वरोशीपासून डाव्या बाजूला वळले की, दोन किलोमीटरवरच आपण पोहोचतो थेट या गावामध्ये. महाबळेश्वरची सावली इथं आहेच; त्यामुळं झाडीही ताहीच दाट, किर्रर्र.. तशीच नागमोडी वळणे आपल्याला मोहित करतात. आंबा, फणसाची आणि मेसाची दाट झाडी कोकणात उतरल्याचा आभास देतात. गावात आले की पुन्हा डाव्या बाजूला एका मिनिटात काश्मीर चढल्यासारखं हे स्वर्गतुल्य ठिकाण येतं. इथली केळीची गर्द बाग पहिली की वसईची आठवण व्हावी. आंबा, फणसाने कोकणाचा सुगंध उतरावा आणि सुरू, सिल्व्हर, अशोकाची झाडे पाहताना आपण जणू काश्मीरच्या भूमीवरच दाखल झालो आहोत, असा आनंद मनातून पाझरावा. आजूबाजूला हिरव्याकंच डोंगरांची वर्दळच उभी जणू. सह्याद्रीचं हे विलक्षण देखणं रूप पाहताना भान हरपून जायला होतं अगदी. पश्चिमेकडे लिंगमळा धबधबा कोसळतोय. पायाखालून वेण्या नदी वाहतोय. यासारखी श्रीमंती काय असेल अजून…? अहो, विधाता सहस्त्र हस्ते हे वैभव उधळतोय. फक्त तो आस्वाद घेण्यासाठी आपण तत्पर असायला हवं. इथले वुडन हाऊस नाजूक कलाबुत्तीचा सर्वोत्तम आविष्कार आहेत. कोकणचं सुख आपल्या पदरात ओतणारी जांभ्या दगडाची घरंही इथं आहेत.
इथल्या टेंटमध्ये राहण्याचा आनंदही वेगळा आणि हो, याहीपेक्षा पाहुणे म्हणून येणार असाल, तर राधेय ऍग्रो त्यासाठीही तत्पर आहे. चक्क यजमानांच्या घरातच राहा, कसलाही त्रास नाही.
अंघोळ करायची असेल तर विहीर शेजारी आहेच. मस्त गार पाण्याचा आनंद इथं घेता येईल. अंगावर शिरशिरी फुलते. इथं मस्त पोहू शकता आपण. गरमागरम हवे असेल तर टेंटमध्ये सोय आहेच. गरम पाणी आणि सुंदर बाथरूम. इथून बाहेर पडलात तर गार वाऱ्याचे झोत आपल्या स्वर्गतास सज्ज. जणू जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा मखमली स्पर्श या वाऱ्यातूनही जाणवतो. तनामनाला शांत करून जातो. जेवण झाल्यानंतर मुलांना इथे खेळू द्या मस्त. इथं क्रीडांगण आहे. क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन हवं ते खेळावं सायंकाळी झुलत्या पुलावर चालण्याचा आनंद घ्यावा. हे चालणं म्हणजेसुद्धा एक थ्रील असतं. रात्रीचा गारवा अलवार उतरताना इथं शेकोटीची आनंद लुटावा. या कँप फायरसोबत डी.जे. नाईट किंवा खास आपल्यासाठी कराओके सिंगिंग. मनोरंजनाची ही झिंग चढत्या रात्रीची रंगत वाढविते. बेधुंद होऊन इथं नाचावं, गावं, त्यासाठी फणसाच्या झाडांखाली सुंदर स्टेज आहे. अहं.. स्टेज म्हणावं की आपल्यातील सुप्तकलागुणांना मिळालेलं व्यासपीठ? ते आपणच ठरवावं. स्वर्गसुखाची महाद्वार इथं आपल्यासाठी खोलली जातात म्हणा ना.
अंगाला न झोंबणारी काळ्या कड्याची उबदार थंडी आपल्याला जणू मायेच्या दुलईत लपेटून घेते. अशावेळी सकाळच्या गर्द थंडी6इथला गवती चहा अमृतासारखा लागतो. इथे आपणच आपले जेवण बनविणार असाल तर साहित्य घेऊन या चुलीची व्यवस्था करून दिली जाईल. फक्त रस्सा बनविणार असाल तर भाकरी-भाताची सोय आहेच आणि सर्वच हवे असेल, तर तेही मिळतं इथं अगदी रुचकर.. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला जेवण करायचे असेल तर इथं तुम्ही अगोदर कल्पना द्यावी लागते.. तुम्हाला बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ यांची चक्क लाकूड फाट्याच्या चुलीवर भाजलेली आणि विस्तवावर शेकवलेली, टर्र फुगलेली पापडी ओली भाकरी मिळते. ही भाकरी खायची कशासोबत? इथल्या झऱ्यावरच्या पाण्यात शिजवलेली, भरडलेल्या काळ्या घेवड्याची आमटी, चटकदार उडदाचे घुटे, वाळलेला वाटाणा, मुरमावर उगविलेला हिरवा कोवळा पावटा याच्या कालवणाबरोबर ही भाकरी खाल्लीत तर, याची चव जिभेवर कायमच रेंगाळत राहील. आणि याहीपेक्षा वेगळं खायचं असल्यास पुरणपोळी, सोबतीला मराठमोळी गुळवणी खायची स्पर्धा लावायला भाग पाडले. तुम्ही मांसाहारी असाल, तर पिकलेल्या तवशाचे (काकडीचे) भोपळ्याचे किंवा कोहळ्याचे वडे, सोबत तांदळापासून बनविलेले केळीच्या पानावरचे घावने व सोबत गावरान कोंबडी किंवा कोंबड्याचा रस्सा.. कसा वाटतो बेत? अंगातली थंडी कुठल्या कुठे पळून जाईल. घाटावरची, घरी बनवलेली चटणी म्हणजे एकदम कडक माल. जिभेवरून भेट काळजात चर्र उतरेल. आणखी मेनू आहेच. तळलेला कांद्यातील बोंबील, सकी सुकटवा खारा मासा मागवा. जिभेला गुदगुदल्या करतच हे मनाच्या तळाशी जाऊन घट्ट रुतून बसेल. साधा बेत आखायचा असेल तर पिठलं-भाकरी व कांदा घेऊन विहिरीकाठी जा आणि जेवणाचा आनंद लुटा. आयुष्यात स्वर्गसुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं?
मग येताय ना मिनी काश्मीरमध्ये, आनंदाचे सोहळे लुटायला…?
-मोहन भणगे, वाटंबे(सातारा)
09/05/2020
पर्यटन मित्र …. आपल्या पर्यटनाचा सोबती…...
आंबा येथे निसर्गाच्या सहवासात बहरलेले
स्नेहल अतिथ्याने परिपूर्ण…..
सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट …..
कोल्हापूर शहरापासून अवघ्या ८० ते ८५ की. मी. अंतरावर असणारे , निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आंबा …
हिरवीगार झाडे, कसलाही गोंधळ नाही, कोणताही त्रास नाही, त्यामुळे पर्यटकांना इथे मनमुराद आनंद लुटता येतो. निसर्गाची मुक्त उधळण , मन उल्हासित करणारे वातावरण त्यामुळे हे ठिकाण म्हणजे लहान महाबळेश्वरच म्हणावे लागेल. लोणावळा खंडाळा पेक्षा ही येथील जंगल सदाहरित , निसर्गरम्य असे आहे.
हा संपूर्ण परिसर प्रदूषणमुक्त आहे. संपूर्ण आंबा परिसरात पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो, त्यामुळे या परिसरात ठिकठिकाणी बारमाही जलसाठे आहेत. त्यामुळे येथील ५० की. मी. परिसरात औद्योगिक विभाग नाही. कोणतीही मोठी इंडस्ट्री नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यातील निवांत ठिकाण म्हणून असंख्य पर्यटक येथे भेट देतात. महाबळेश्वर, लोणावळा खंडाळा , उटी यांच्या तुलनेत खूप कमी खर्चात येथे निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो.
आंबा परिसरात मनाला आनंद देणारी, मनाला सुख देणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. मानोली (आंबा) येथील सह्याद्री व्हॅली या कृषी पर्यटन केंद्रापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर मानोली धरण आहे. तिन्ही बाजूंनी घनदाट जंगल असून अथांग अशा बॅक वॉटर ने पसरलेले , स्वर्गीय आनंद देणारे गेळवडे धरण आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण अविस्मरणीय असे आहे. येथून जवळच श्री मार्लेश्वर , स्वामी स्वरूपानंद यांचे पवित्र पावन ठिकाण पावस, डोळ्यांत न मानणारे , नितांत सुंदर अशा सागर किनाऱ्या वर वसलेले गणपतीपुळे चे गणेश मंदिर तसेच विलोभनीय अशा समुद्राच्या पाण्याने वेढलेला एतिहासिक असे रत्नागिरी हे शहर आहे. अशा या निसर्गसंपन्न , निरव शांतता असलेल्या भागात स्नेहल आतिथ्याने परिपूर्ण , निसर्गाच्या सहवासात बहरलेले सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अप्रतिम सुखसोयींनी परिपूर्ण असून, पर्यटकांचा निवास सुखकर करणाऱ्या अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. या रिसॉर्ट मधील सुमधुर स्वादिष्ट भोजन तर पर्यटकांना तृप्त करेल असे अवीट आहे. पर्यटकांनी आगाऊ सूचना केल्यास येथे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या भाज्यांसोबत भाकरी, वांग्याचे भरीत असे अस्सल ग्रामीण शाकाहारी भोजन सुद्धा भेटू शकते. ताज्या , धारोष्ण दूधापासून बनवलेली बासुंदी तसेच पुरी, श्रीखंड अगदी पुरणपोळीचे जेवण ही तेथे उपलब्ध आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार अस्सल कोल्हापुरी झणझणीत मांसाहारी जेवणाची ही सोय रिसॉर्ट मध्ये केली जाते. रिसॉर्ट मध्येच संगोपन केलेल्या कोंबड्यांचे गावरान चिकन बरोबरच तांबडा पांढरा रस्सा या सर्वाची लज्जत ही येथे चाखायला मिळते. त्यामुळे निसर्गाच्या गहिऱ्या सानिध्यात सह्याद्री व्हॅली रिसॉर्टमध्ये आलेले पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून अगदी तृप्त होतो. सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट मध्ये एसी , नॉन एसी रूम्स ची सोय असून स्पेशल सेपरेट कॉटेज ची सुविधा ही येथे उपलब्ध आहे. भव्य असा लॉन ही आहे. शिवाय मीटिंग, सेमिनार आणि इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा येथे आहे. या रिसॉर्ट मध्ये राहण्याचे शुल्क ही सर्वसामान्यांना परवडणारे आणि त्यांचा आवाक्यातील आहे. प्रौढांसाठी प्रत्येक दिवसासाठी ७०० रुपये आकारले जातात. ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी प्रती दिवस ६०० रुपये आकारले जातात. याच पॅकेज मध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण व रात्रीचे शुध्द शाकाहारी जेवण , दिवसातून ३ वेळा चहा , कॉफी दिली जाते . रिसॉर्ट तर्फे पावनखिंड पायी , विशाळगड, नाईट जंगल सफारी , मॉर्निंग सफारी नाईट सीन बर्ड साईड सीन चे आयोजन ही करण्यात येते. स्वर्ग सुखाचा आनंद काय आणि कसा असतो हे अनुभवायचे तर आंबा येथील सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट ला भेट द्यायलाच हवी…...
07/05/2020
पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....
भारतातील पाहिले राष्ट्रीय सागरी उद्यान
जामनरचं मरीन नॅशनल पार्क......
वन्यजीव, पशुपक्षी यांचं संरक्षण होणं ही मानवी जीवनचक्राची पायाभरणी ठरू शकते. एखादा जीव लुप्त होणं म्हणजे ही जीवनसाखळी कमकुवत होणं. सूक्ष्म किंवा क्षुल्लक वाटणारा कृमी, किटकही निसर्गचक्राचा मजबूत धागा असतो. निसर्गातील मानवी हस्तक्षेप आणि यांत्रिकीकरणामुळे सध्या अनेक जीवांच्या अस्तित्वावरच कुऱ्हाड कोसळली आहे. ही संरक्षण व्यवस्था अभयारण्य उभारणीतून पुन्हा मजबूत केली जाऊ शकते. अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातीचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत(उदा. डायनासौर किंवा भीमसरट, स्मयलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वुली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडा पक्षी, वगैरे) यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते; पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज 20 प्राण्यांच्या, 8 पक्षांच्या तसेच 33 झाडांच्या जाती, तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जीवांच्या जाती अभयारण्यांच्या माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे.
अगदी याच धर्तीवर सागरी जीवांचं संरक्षण व्हावं या हेतूने भारतात अनेक सागरी उद्यानांची निर्मिती केली गेली. इथल्या समृद्ध जैवविविधते मधून अतिशय दुर्मिळ अशा समुद्रजीवांचं जतन आणि संवर्धन शक्य झाले आहे. ऑलिव्ह कासव, समुद्री मगर आणि अशा अनेक सस्तन जीवांचे पोषण या सागरी अभयरण्यांतून होत असते. निसर्गचक्राचे संतुलन राखण्यासाठी या जीवांचे मोल तसे अनमोल आहे. पर्यटनाचेस्तोत्र या अभयारण्यांनी खुले केले आहेत. सोबत सागरी ज्ञानाचा अमूल्य खजिना या अभयारण्यांच्या रुपानं आपल्यासमोर आहे भारतातील अशा अनेक अभयारण्यांना जगभरातील पर्यटक भेटी देत असतात. यापैकीच एक म्हणजे गुजरातच्या जामनगर भागातील मरीन राष्ट्रीय उद्यान.
भारतातील हे पाहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. 1982 साली स्थापन हे सागरी उद्यान सुमारे 162.89 चौरस किलोमीटरचे आहे या शिवाय 458.92 चौरस वर्ग करण्यात आले आहे. ज्यांना नाविन्याची ओढ आहे, सतत वेगळं काही पाहण्याचे वेढ आहे अशा सफारींना साद घालते आहे हे जामनगरचे मरीन राष्ट्रीय सागरी उद्यान. समुद्रिय जीवांचा अभ्यास करणारे तसेच मायक्रो फोटोग्राफीची आवड असणारे अनेक लोक इथं भेटी देत असतात. जामनगरच्या किनाऱ्यावरील जवळपास बेचाळीस बेटांमध्ये सर्वांत प्रसिद्ध द्विप म्हणजे पिरोटन बेट. पिरोटनला भेट द्यायची असेल तर जामनगरहूनरोझी पोर्टला जावे लागते. तिथून बोटीने सात नॉटिकल मैल अंतरावर पिरोटन बेट आहे. इथे केवळ वनविभाग आणि लाईट हाऊसचे लोक असतात. पर्यटकांनी इथं जायचं तर वनभिभाग तसेच कस्टम विभागाची परवानगी घेणं आवश्यक असतं. पर्यटकांना नरारा येथील सागरी किनाराही खुणावत असतो. जामनगरपासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर जामनगर-द्वारका महामार्गावर नरारा शहर आहे. समुद्रिय ओहोटीच्या वेळी पाणी आत गेले की इथल्या किनाऱ्यावरचा खडकाळ भाग उघडा पडतो. अशावेळी या भागांत फिरणारे अनेक सागरी जीव पाहणं ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. या काळात नरारा येथील स्थानिक समुद्रजीव संस्थांतर्फे कोरल वॉकचे आयोजन केले जाते. इथे सहभागी होताना या सागरी जीवांविषयी जिव्हाळा, त्यांच्याविषयी जाणून घेण्याची ओढ मनात हवीच. अशा दुर्मिळ जीवांविषयी आपल्याला माहिती असेल, अभ्यास असेल तर आपल्याला गाईडची गरज भासत नाही.
जामनगरच्या मरीन नॅशनल पार्कमध्ये सुमारे सत्तर प्रकारचे स्पॉन्ज, सदतीस प्रकारचे कोरल, झिंग्यांच्या सत्तावीस प्रजाती, खेकड्यांच्या तीस प्रजाती, 108 प्रकारचे तपकिरी, हिरव्या आणि लाल रंगाचे शेवाळ, याचबरोबर ग्रीन सी, ओलीव रिडले आणि लेदरबॅकसारख्या अतिशय दुर्मिळ कासवांच्या प्रजाती इथं आढळून येतात. डॉल्फिन्सच्या विविध प्रजातींमध्ये कॉमन डॉल्फिन्स, इंडो पॅसिफिक बोटलनोज डॉल्फिन्स आणि इंडो पॅसिफिक हंप बॅक्ड डॉल्फिन्सही इथं आढळतात.
या सर्व जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धण होणे ही काळीची गरज आहे. संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे; पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत.
पर्यावरण संवर्धन, जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) यांसारखे शब्द सध्या खूपच पखालीचे झाले आहेत. एकविसाव्या शतकात जैवसंपदेशी संबंधित उधोग एकूण अर्थव्यवहाराच्या 40 टक्के उलाढाल घडवतील, असा अंदाज आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्लेषण केल्यासच कळून येईल. उदा. अनेक प्रकारची झाडे-झुडपे, वेळींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले, तर फळमाशा, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, प्राणी तर वाढतीलच; पण त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी, पोफळी, आंबा, काजू यांसारख्या बागाही टिकून राहतील. असेही आढळून आले आहे, की परिसरातल्या टेकड्या, डोंगरांवर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे डोह, विहिरी लवकर आटत नाहीत.
अलीकडील काळात मात्र इतरत्र आढळणाऱ्या मानवी हस्तक्षेपाप्रमाणेच जामनगर सागरी पार्कमधील जैवविविधताही धोक्यात आली आहे. सिमेंट उद्योगांद्वारे कोरल आणि रेती काढणं. पाण्याची वाढ होणं. निसर्गाचा हरवत चाललेला समतोल, तेलनिर्मिती, रासायनिक उद्योग, मशीनकृत मासेमारीच्या बोटी अशा अनेकविध कारणांनी ही जैवविविधतता धोक्यात येते आहे.
जैवविविधतेच्या ऱ्हासाचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, आर्थिक फायदा. नुकसानीच्या हिशेबातूनच या जीवांकडे पाहण्याची मानवी वृत्ती. ही वृत्ती व्यवहारवाद सोडून जबाबदारीचे भान ठेवून जागृत व्हायला हवी.
भारतातील सर्व जीवसंपदा काही थोड्या राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातच फक्त सागरी भागातच नव्हे तर देवराया, शेती, नद्यांतील डोह, पाणवठे एवढेच नव्हे, तर शहारांमधूनही (टेकड्या, शैक्षणिक संस्थांचे परिसर) जीवसंपदा आहे आणि त्याच्याही संरक्षणाची आवश्यकता आहे. खासगी हितसंबंधाची जपणूक, लोकांपर्यंत चळवळ नेणे यांसारख्या गोष्टींमधून जीवसंपदेचे रक्षण शक्य होणार आहे…
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
D2/905, Padamavati Colony , Devkar Panand
Kolhapur
416012