Konkani Ranmanus
02/06/2026
राखणदार यात्रेचा प्रारंभ
📅 दिनांक : १३ जून २०२६, शनिवार
भारतीय कालगणनेनुसार हा दिवस ज्येष्ठ अधिक मासातील कृष्ण पक्ष त्रयोदशी असून ग्रीष्म ऋतू आणि उत्तरायण कालखंडात येतो. या दिवशी कृत्तिका नक्षत्र असून पुढे रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ होतो.
🌿 पंचांग संदर्भ
• वार : शनिवार
• ऋतू : ग्रीष्म ऋतू
• अयन : उत्तरायण
• मास : ज्येष्ठ अधिक मास
• पक्ष : कृष्ण पक्ष
• तिथी : त्रयोदशी
• नक्षत्र : कृत्तिका (नंतर रोहिणी)
कोकणच्या माती, पाणी, जंगल, देवराई आणि पारंपरिक जीवनपद्धतीच्या रक्षणाचा संकल्प घेऊन राखणदार यात्रा या दिवशी प्रारंभ होत आहे. आपल्या भूमीशी असलेले नाते पुन्हा जागवण्याचा, स्थानिक ज्ञान समजून घेण्याचा आणि निसर्गरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
मृग नक्षत्राच्या उंबरठ्यावर, कोकणच्या माती-पाणी-जंगलांच्या रक्षणासाठी राखणदार यात्रा सुरू होत आहे.
“राखणदार होऊ या आपल्या मातीचे, पाण्याचे आणि जंगलांचे.”
आदरणीय कास ग्राम विकास संस्था,
काल आपल्या गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मला संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
आज कोकण अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरे जात आहे. जमीन, पाणी, जंगल, शेती आणि गावांची ओळख टिकवण्यासाठी गावागावातील लोकांनी एकजूट होऊन उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मातीचे प्रश्न हे फक्त एखाद्या व्यक्तीचे नाहीत, तर संपूर्ण पिढ्यांच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी आता एकत्र येऊन या खऱ्या प्रश्नांवर आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.
कालच्या कार्यक्रमातून गावात जागृतीची एक सकारात्मक सुरुवात झाली, असा मला विश्वास वाटतो. भविष्यातही अशा लोकजागृतीच्या उपक्रमांमध्ये आपण सर्व मिळून काम करू, ही अपेक्षा.
आपल्या प्रेम, सन्मान आणि विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
19/05/2026
रानमाणूस फाउंडेशन, सिंधुदुर्ग तर्फे काम करत असताना मला CORO India संस्थेची SAMTA Fellowship मिळाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.
गेली अनेक वर्षे आपण निसर्ग, देवराया, स्थानिक अन्नसंस्कृती, शाश्वत जीवनशैली आणि गावकेंद्रित विचार यांवर काम करत आलो आहोत. पण शाश्वतता (Sustainability) आणि समता (Equity) हे दोन्ही विषय एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, ही जाणीव सतत अधिक खोल होत गेली.
जंगल वाचवणारे, पाणी जपणारे, बियाणे टिकवणारे, भूमीशी नातं जपणारे समाज आज अनेकदा विकासाच्या मुख्य प्रवाहातून वंचित राहतात. पर्यावरणाचा प्रश्न हा फक्त झाडांचा किंवा हवामानाचा विषय नसून तो सामाजिक न्याय, संसाधनांची समानता आणि मानवी सन्मानाशी जोडलेला आहे.
CORO च्या SAMTA Fellowship माध्यमातून आता रानमाणूस फाउंडेशन आणि CORO India मिळून:
* शाश्वत आणि न्याय्य जीवनपद्धती,
* ग्रामीण नेतृत्व,
* स्थानिक ज्ञानव्यवस्था,
* पर्यावरण आणि सामाजिक समता,
* गावकेंद्रित भविष्य
या विषयांवर एकत्रितपणे काम करणार आहोत.
आमचा विश्वास आहे की भविष्य फक्त “green” नसून “just and equitable” असायलाही हवं.
देवराईपासून ते समाजरचनेपर्यंत,निसर्ग आणि माणूस यांच्यातील संतुलन पुन्हा निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
CORO INDIA
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Tulas
Savantvadi
416515