Sanddip Solune
*// श्री स्वामी समर्थ //*
*वास्तु शास्त्र*
*ईशान्य दिशा (देवघर)*
साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,
संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे
१) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल
२) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा
३) ईशान्येला नेहमी उतार असावा
४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये
५) या कोपऱ्यात संडास कचराकुंडी, संडासची टाकी ,चप्पल , जिना , विजेचा मीटर , मोठी झाडे स्वयंपाकघर , वाहनतळ असणे अशुभ
६) वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वस्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अश्या जागी वंशनाश होतो दारिद्रय येते विनाकारण संकटे येतात.
७ ) काही महाभाग (ज्योतिष) ईशान्येला संडास असेल तरी विना तोडफोड उपाय करतो असे सांगून पैसे घेतात अश्या गोष्टीवर ते तोडल्याशिवाय खरोखरच उपाय नाही उगीचच खोटे उपाय करू नका आणी कुणाला हि ईशान्ये ला संडास असताना विनातोड्फोड उपाय करून फरक पडला असल्यास मला नक्की कळवा
८) विनातोड्फोड उपाय वास्तूमध्ये होतच नाही असे नाही पण विनातोड्फोड ६० ते ७० % उपाय नक्कीच होतात.
९) या जागी रोज देवपूजा करावी , दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा..
१०) इथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच , अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले चालतील
*पूर्व दिशा*
--------------------------
१) या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य ,धन व बुद्धी मध्ये वाढ होते
२) हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धन नाश होतो
३) पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते
४) या दिशेला घराचा दिवाणखाना असावा
५) मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असव्यात
६) या जागी संडास असल्यास रुधय रोग , रक्तविकार , उष्णज्वर,शिरोरोग होतात असे अनुभव आहेत
७) या जागी फिक्का गुलाबी, क्रीम, पांढरा , असे रंग असावे.
८) या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत.
९) या दिशेला कुंपण इतर दिशे पेक्षा कमी उंचीचे असावे.
१०) राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा.
*आग्नेय दिशा*
--------------------------
१) या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते.
२) या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विचेची मोटार अश्या वस्तू असाव्यात.
३) आग्नेय दिशेला विहीर कुपनलिका पाण्याची टाकी असल्यास शत्रूंचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात.
४) या दिशेला वाहनतळ करू शकता.
५) हा कोपरा दुषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो.
६) या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा.
७) या दिशेला दार असल्यास संबधित तज्ञाकडून उपाय करून घ्यावेत अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात.
८) या दिशेला हलका गुलाबी फिक्कट केसरी रंग देऊ शकता.
९) अग्नेयेचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात.
*दक्षिण दिशा*
--------------------------
१) या दिशेला दार अशुभ आहे. या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो आजारपण असते.
२) हि दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असव्यात.
३) या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृतू होतात.
४)दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लाऊ नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे.
५) या दिशेला उंच झाडे लावावीत.
६) या दिशेला निळा भुरका रंग चालेल.
७)या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कलह असतो.
८) दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते.
९) या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण असते.
१०) या दिशेला जिना शुभ फळ देतो.
११) या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात.
*नैऋत्य दिशा*
--------------------------
१) हि दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी.
२) या दिशेला घरातील मोठ्यांचे बेड रूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी.
३)या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये.
४) हि दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो.
५) या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल.
६) या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अति उत्तम
७) जी व्यक्ती घरात या जागच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते.
८) या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा.
९) या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकीर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात तसेच संकटांची मालिका चालू राहते असा अनुभव आहे.
*पश्चिम दिशा*
--------------------------
१) या दिशेला नेहमी संडास , बाथरूम असावे.
२) या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते.
३) हि दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते.
४) या दिशेला सेप्टिक टैंक चालेल.
५) प्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी.
६) ईशान्य दिशे पेक्षा जास्त उतार असल्यास दुख भोगावे लागेल.
७) गडद सर्व रंग चालतील.
*वायव्य दिशा*
१) या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेड रूम असावे.
२) या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ
३) या दिशेला विहीर कुपनलिका ,जमिनीच्या खालचा पाण्याचा साठा पक्षाघात वेडेपणा कावीळ असे रोग दर्शवतात
४) या दिशेला जिना शुभ
५) ज्यांचे विवाह जमत नाही अश्या व्यक्तींनी या दिशेला झोपावे.
६) व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो.
७) या दिशेला संडास चालेल.
*उत्तर दिशा*
--------------------------
१) साक्षात कुबेराची हि दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसे कमी पडत नाही
२) या दिशेला नेहमी उतार असावा…
३) या दिशेला पाण्याचा साठा शुभ
४) या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी.
५)हि दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी.
६) या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी.
७) महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी.
८) या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी
९) या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते
१०) मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे.
*"श्री स्वामी समर्थ
01/10/2023
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
*तांब्याचं आयुर्वेदीक महत्त्व*
*आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.*
*तांब्याचे भांडे वापरण्यामागील इतर कारणे…*
*१)पाणी शुद्ध होणे :* *आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात. विशेषत: पोटाशी संबंधित समस्या मुळापासून नष्ट होतात.*
*२)त्वचा उजळते :*
*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्कीन(मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.*
*३)थायरॉइड आजार दूर होतो :*
*तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवते तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास थायरॉइड आजार नियंत्रणात येतो.*
*४)अॅसिडीटी, गॅस दूर होतो :*
*अॅसिडीटी, गॅस किंव्हा पोटाची इतर समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. यामुळे पोटाचे सर्व आजार दूर होतात.*
✿ 🔅⚜🔅⚜🔅 ✿ 🔅⚜🔅⚜🔅 ✿
*विनामूल्य 🏩वास्तुशास्त्र मार्गदर्शन* सर्व प्रकारच्या समस्यां वर 🔝उपाय केले जाते.
✿┈┉❀┉❀┉꧁✿꧂┉❀┉❀┉┈ ✿
🌸 *साई☝🏻श्रध्दा 🌸स्पिरीच्युअल सर्व्हिसेस.*🌸
✿┈┉❀┉❀┉꧁✿꧂┉❀┉❀┉┈ ✿
🧭 ✿ *वास्तुशास्त्रज्ञ* ✿
🏛️ ✿ *स्थापत्यशास्त्र* ✿
🙇♀️ ✿ *स्वप्नशास्त्र* ✿
🚩 ✿ *धर्मशास्त्र* ✿
📜 ✿ *ज्योतिषाचार्य* ✿
🔢 ✿ *अंकशास्त्रज्ञ* ✿
📱 *: ८१०८१८८३८८.*
🌸 *II ॐ सांई☝🏻राम : II🌸 माऊली* 👏🏻
✿ 🔅⚜🔅⚜🔅 ✿ 🔅⚜🔅⚜🔅 ✿
*५)वजन कमी होते :*
*वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास लाभ होईल. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल.*
*६)घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात :*
*तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव तसेच डायरिया, अतिसार, कावीळ यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले किटाणू नष्ट होतात.*
*७)सांधेदुखीत आराम मिळतो :*
*आजकाल कमी वयातच अनेक लोकांना सांधेदुखीचा आजार होत आहे. तुम्हीही या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणार्या त्रासापासून आराम मिळतो.*
*८)अॅनिमियाशी सामना करतो :*
*शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न (लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अॅनिमियाशी सामना करणार्यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.*
*म्हणून रोगांना दूर ठेवण्यासाठी तांब्याच्याभांड्यांचा वापर करणे जरुरी आहे. आणि म्हणूनच आपण पूर्वीपासूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करत आलो आहे, एवढेच नाही तर आपण पूजेतही तांब आणि पितळाच्या भांड्यांचाच वापर करतो.*
*चला तर जाणून घेऊ आपल्या कडे पूजेत का वापरतात तांब्याच्या वस्तू*
*आपल्याकडे पूजेत वापरण्यात येणारी ताम्हण, पळी, भांड, देव्हाऱ्यातील देवदेवतांच्या मूर्तीदेखील तांब्यापितळ्याच्या असतात.*
*● कारण तांबं – पितळ या धातूंची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते.*
*● तांब्या- पितळ्याच्या लालसर व सोनेरी रंगांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मनाची प्रसन्नता वाढते.*
*● आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता तांब्या- पितळ्याच्या भांड्यात तीन तास ठेवलेले पाणी निर्जंतुक होत असल्याने पाणी उकळण्याचा खर्चदेखील वाचतो.*
*● तांबं आणि पितळ हवेतील बाष्पाच्या प्रक्रियेमुळे काळे पडते. त्यासाठी ते नियमित स्वच्छ करणे आवश्यक असते. ताक, लिंबू, राख वापरून ते नीट स्वच्छ होत नाहीत. पितांबरी पावडरचा वापर केल्याने भांडी स्वच्छ तर होतातच शिवाय भांड्यांची चमकही कायम राहते.*
------------------------------------------------
🌸 *II ॐ सांई☝🏻राम : II🌸 माऊली* 👏🏻
-------------------------------------------------
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
400610