Marathi
15/06/2026
तुकाराम मुंढे सारखी व्यक्ती प्रत्येक विभागात असायला पाहिजे. 👌
वडापावचा प्रवास ३ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत झाला. पूर्वी वडापाव वर्तमानपत्रात दिला जायचा. चांगल्या न वापरलेल्या कागदाची किंमत तरी किती असायची? ग्राहक वडापाव महाग झाला तरी पैसे देतच होता. मग स्वच्छ, न वापरलेला आणि अन्नपदार्थांसाठी योग्य कागद का वापरला जात नव्हता?
नियम तर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. पण यंत्रणा झोपलेली असल्यामुळे विक्रेते शाई लागलेल्या वर्तमानपत्रात अगदी गरम वडा देत होते. कागद भिजून त्यावरील शाई वड्यावर चिकटली तरी ग्राहकाला तोच वडापाव खावा लागत होता.
मग अचानक आठवडाभरात सर्वत्र बदल कसा झाला? फक्त एक अधिकारी बदलला आणि सगळीकडे खाकी कागदी पिशव्या दिसू लागल्या. याचे कारण म्हणजे त्या अधिकाऱ्याला आपल्या अधिकारांची आणि जबाबदारीची जाणीव आहे. तो कोणाच्याही रिमोट कंट्रोलवर काम न करता नियमांची प्रभावी अंमलबजावणी करतो. नियम नवीन नाहीत; फक्त आता ते खऱ्या अर्थाने लागू होताना दिसत आहेत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
413211