Ashish Bhosale
28/11/2025
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०)
ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे.जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले.
लेखनकाळ - साहित्य प्रकार - नाव
इ.स.१८५५ - नाटक - तृतीय रत्न
जून, इ.स. १८६९ - पोवाडा - छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
जून इ.स. १८६९ - पोवाडा - विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ - पुस्तक - ब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३- पुस्तक - गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ - अहवाल - सत्यशोधक समाजाची तिसर्या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७ - अहवाल - पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ - निबंध - पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७ - पत्रक- दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ - निवेदन -हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३ - पुस्तक - शेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ - निबंध - महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५ - पत्र - मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५ - पुस्तक - सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५ - पुस्तक - सत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ - पुस्तक - इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ - जाहीर प्रकटन - ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६ - पत्र - मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ -पुस्तक - सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ - काव्यरचना - अखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७ - मृत्युपत्र - महात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ - (प्रकाशन) पुस्तक - सार्वजनिक सत्यधर्म
(माहिती संकलन- आशिष भोसले)
देव, देश आणि धर्म यांना प्राधान्य देणारा, "अटक" पासून "कटक" पर्यंत मराठा (जात नाही समुह) साम्राज्य पसरवणारा, "आता विश्वात्मके देवे", म्हणत सगळ्या जगाच्या कल्यणाचं "पसायदान" मागणारा, " भेदाभेद भ्रम, अमंगळ " असं ठणकावून सांगणारा,"खरा तो एकचि धर्म...जगाला प्रेम अर्पावे" म्हणून हळवा होणारा,
महाराष्ट्र कुठे हरवलाय.....
समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकमेकांशी जोडून, समन्वय साधून सर्वाना एका सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर आणण्यासाठी अपार मेहनत घेतलेला,समानतेची भावना कायम रहावी, टिकावी आणि दिवसेंदिवस वृद्धींगत होण्यासाठी झटणारा, बाकीच्या राज्यांपेक्षा पुढारलेला, काळाची पावलं आधीच ओळखुन...हुशारीने स्वतः ची प्रगती साधणारा, जवळपास सर्वच क्षेत्रात आपलं द्रष्टेपणं सिद्ध केलेला,
महाराष्ट्र कुठे हरवलाय......
आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करणारा, स्वतः उपाशी राहून समोरच्या व्यक्तीचं पोट भरणारा, समाजाचं (समूह ह्या अर्थाने - जात, धर्म, पंथ ह्या अर्थाने नाही), राज्यांचं, देशाचं आणि पर्यायाने जगाचं नेतृत्व करण्याची कुवत- क्षमता असणारा,
हा मराठा (मराठी माणूस ह्या अर्थाने) इतका स्वार्थी, आप मतलबी, कोत्या मनाचा कधी झाला कळलंच नाही....
माझा पक्ष, माझं चिन्ह, माझा मतदारसंघ,माझा निधी, माझे कार्यकर्ते, माझे मतदार, माझा मान, माझा अपमान, माझी कोंडी, माझी अवहेलना, माझी घुसमट, माझं हे.... आणि माझं ते....
मी नेता, मी महानायक, मी द्रष्टा, मी आश्वासक चेहरा, मी खंबीर नेतृत्व, मी लाखोंचा पोशिंदा, मी दोस्तांचा दोस्त आणि दुश्मनांचा दुश्मन, मी मोठ्या मनाचा, मी दिलदार, मी अमुक.... आणि मी तमुक...
ह्या अहमहिकांमध्ये ज्याच्या नावावर, ज्याच्यासाठी हे सगळं केलं जातं (खरं तर करण्याचा आव आणला जातोय) तो कुठे आहे. त्याच्या कोणीतरी विचार करतोय का?
राजकारणात सक्रिय सहभागी नसलेल्या सामान्य माणसाला पुर्वी मतदानाच्या दिवशी तरी काही किंमत होती. इथुन पुढे कदाचित तेवढी सुद्धा मिळणार नाही, बहुतेक...
बघा पटतंय का...?
पटलं तर तुमचं मत कळवा आणि आवडलं तर माझ्या नावासकट (प्रसिद्धिसाठी नाही तर हे लिहीण्याची जवाबदारी घेण्यासाठी म्हणून) पुढे पाठवा (आताच्या मराठीत -शेअर (share) करा).
आपलाच-
आशिष जयराम भोसले
11/10/2024
रतन टाटांना समर्पित :
सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!
मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?
जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!
-सुरेश भट
Click here to claim your Sponsored Listing.