Marathi Aastha
26/03/2026
सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय योग्यच आहे. नाहीतर वर्षानुवर्षे राहून मालकी हक्क मिळवण्याची चुकीची प्रथा सुरू झाली असती.
सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केलं आहे की, एखादा भाडेकरू कितीही वर्षे — अगदी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ — एखाद्या घरात किंवा मालमत्तेत राहत असला, तरी त्या मालमत्तेचा कायदेशीर मालकी हक्क कायम घरमालकाकडेच राहतो.
न्यायालयाने ठामपणे सांगितलं की “आम्ही पिढ्यानपिढ्या इथे राहतो” हा दावा मालकी हक्क मिळवण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. कारण भाडेकरू हा मालमत्तेत फक्त मालकाच्या परवानगीने राहतो आणि त्यामुळे त्याला मालकी हक्क मिळत नाही.
तसेच ‘adverse possession’ म्हणजेच विरुद्ध ताब्याचा सिद्धांत भाडेकरूंना लागू होत नाही, हेही न्यायालयाने स्पष्ट केलं.
हा निर्णय देशभरातील लाखो घरमालकांसाठी दिलासादायक मानला जात आहे. भाडेकरार हा केवळ कायदेशीर करार असतो, तो कोणत्याही परिस्थितीत मालकी हक्क निर्माण करत नाही — हे न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केलं.
चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे संकेत
काळा चहा पिल्याने काय होते
गुढीपाडवा दिवशी सोने नाही तर घरी आणा ही २ रुपयांची वस्तू
Click here to claim your Sponsored Listing.