Vision Finserv
04/09/2020
*मेडिक्लेम खरेदी करण्या पुर्वी...*
आपत्कालीन स्थितीत आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम हा सर्वसामान्यांसाठी एक मोठा आधार आधार बनला आहे. वैद्यकीय उपचाराचे वाढते खर्च आणि अस्थिर परिस्थितीमुळे अशा प्रकारचे विमा कवच असणे काळाची गरजच बनली आहे. आरोग्य विमची वाढती मागणी लक्षात घेता,खालील मुद्यांच्या आधारे तुम्ही योग्य तो प्लॅन खरेदी करण्यास मदत होऊ शकेल .
1) *विमा कंपनीशी आपल्या जवळचे कोणते हॉस्पिटल कॅशलेस मध्ये आहेत हे पहावे .*
2) *पोलिसी मध्ये रूम रेंट किती मिळतो हे पाहावे*
3) *हॉस्पिटल मध्ये दाखल होण्या आधीचे व डीस्चाज नंतरचे किती दिवसांपर्यंतचे खर्च मिळतात हे पाहावे,*
4) *NO CLAIM BONUS किती मिळतो हे जरूर पाहावे.*
5) *काही आजारांसाठी पहील्या दोन वर्षे कव्हर मिळत नाही* याबाबत पॉलिसी उतरवताना कंपनीकडून संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे .
6) *विमाधारकास अगोदर कोणता आजार अथवा व्याधी असल्यास प्रथम विमा प्रतिनिधीस ह्याची पूर्वकल्पना देऊन तुमचा होणार गैरसोय टाळावी.*
7) *विमा पॉलिसी मध्ये CO-PAYMENT आहे का याची खात्री करावी.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
8888874724
9923055666
maheshkulkarni13Gmail.com
१.बचत आणि गुंतवणूक यातील फरक ५०% लोकांना सांगता येत नाही.
२.स्वतःच्या फॅमिली चा महिन्याचा खर्च किती हे ७०% लोकांना सांगता येत नाही.
३.वयाची ४० उलटली तरी अजून टर्म इन्शुरन्स म्हणजे काय माहीत नाही.
४.हेल्थ इन्शुरन्स वरील खर्च म्हणजे काहीजणांना वायफळ खर्च वाटतो.
५.नोकरी आणि व्यवसाय करून १० वर्षे झाली तरी पुढील ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवता आली नाही.
६.स्वतःचा इन्कम टॅक्स कसा कॅलकुलेट होतो अजून आपल्याला माहीत नसते.
७.व्यवसाय करतोय पण GST म्हणजे काय माहीत नसते.
८.शेअर बाजार जुगार आहे हे ठामपणे समाजात बोलत असतो.
९.दामदुप्पट योजनेत बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक ठेवणारे पैसे गुंतवणारे आपणच असतो.
१८०० रुपयांचा हिशेब नाही लागला तर काकू ना तसे काही फरक पडत नाही कारण तो एक व्यवहार आहे पण आयुष्यात शिक्षित समजणारे आपण आर्थिक विषयात अडाणी राहणार असेल तर भविष्यात परिस्थिती पुढीलप्रमाणे आपल्याला चपराक लावल्याशिवाय राहत नाही....
१.कष्ट करून कमावलेला पैसा फक्त बचत केला जातो त्यामुळे त्यात वाढ तर होतच नाही पण महागाई नुसार त्याचे मूल्य कमी होते आणि मग वेळेला कर्जे काढावे लागते.
२.कमावणे आणि खर्च करणे यात इतके व्यस्त असतात लोक कि स्वतःचा ताळेबंद त्यांना माहीत नसतो. त्यामुळे आर्थिक निर्णय चुकतात.
३.घरातील मुख्य व्यक्तीलाच टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती नसल्याने त्याने तो घेतलेला नसतो त्याचा मृत्यू झाल्यास परिवार मानसिक बरोबरच आर्थिक स्तरावर पण कोसळतो.
४. घरातील एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आल्यावर सर्व बचत मोडून, सोन्यावर कर्जे घेऊन पैसे भरायची वेळ येते तेव्हा हेल्थ इन्शुरन्स चे महत्व पटते.
५.अचानक नोकरी किंवा व्यवसाय ठप्प होतो आणि जवळ काहीच शिल्लक नसते.
६.वर्षोनुवर्षे कमाई येतेय, इन्कम टॅक्स पण भरला जातोय पण तो कसा कॅलकुलेट होतो माहीत नाही.
७.GST च्या नावाने मैफिली रंगल्या असतील पण GST कसा किती चार्ज होतो हे भल्याभल्यांना सांगता येत नाही.
८.शेअर बाजारात १ रुपया गुंतवणूक न करता शेअर बाजार म्हणजे जुगार ठामपणे सांगणारे. जागतिक दर्जाच्या व्यवसायात पैसे गुंतवणे हे त्यांना पटत नाही.
९.राष्ट्रीयीकृत बँक जिथे वर्षाला ५/६ % व्याजदर देत असताना महिन्याला १०% देणाऱ्या योजनेत पैसे लावून गमावून बसणारे असतात.
Click here to claim your Sponsored Listing.