VastuPriya
*भगवान शंकरांची सेवा करतांना....!*
*भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.*
*खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करु नका.*
*१. शंख – शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.*
*२. हळद कुंकू- भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.*
*३. तुळशी पत्र – असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.*
*४. नारळ पाणी – नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.*
*५. उकळलेले दूध – उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.*
*६. केवड्याचे फूल – भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.*
*७. कुंकू किेंवा शेंदूर – कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.*
*!!ॐ नमः शिवाय !!*
|| जय जगदंब ||
*-दाते पंचांग तर्फे नवरात्री विशेष माहिती-*
यंदा नवरात्र २२-सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे १० दिवसांचे आहे.
🌸आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो, यावर्षी २२ सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्रारंभ होणार असून याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. परंतु तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे ८ किंवा १० दिवसांचे होऊ शकते.
◾यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र १० दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये देखील तृतीया वृद्धी तिथी होती आणि नवरात्र १० दिवसांचे होते.
*🍃यावर्षी किती माळ घटावर अर्पण कराव्यात?*
नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा रोज एक याप्रमाणे अर्पण कराव्यात. वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात.
*🪔अखंड दीप 😗
नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो.
*🔶नवरात्री उपवास बाबत 😗
अनेकजण नवरात्रीचे सर्व दिवस उपवास करतात मात्र काही कारणाने ते शक्य नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करावा. तसे करणे ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचे दिवशी तरी करावा.
*🔶घटस्थापना व सुतक/सोयर बाबत 😗
नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (24 सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (27 सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (29 सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (30 सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे.
*🔶नवरात्री मध्ये देवतांच्या पुजनाबाबत 😗
नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची अभिषेक करुन नेहमी प्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर / टाकावर फुलाने पाणी शिंपडून दुरून पंचोपचार पूजा करावी.
🔶यावर्षीच्या नवरात्रातील काही प्रमुख दिवस -
🌷ललिता पंचमी :- 26 सप्टेंबर, शुक्रवारी
🌷महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) :- 29 सप्टेंबर, सोमवारी
🌷दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास :- 30 सप्टेंबर, मंगळवारी
🌷महानवमी, नवरात्रोत्थापन :- 1 ऑक्टोबर, बुधवारी
विजयादशमी (दसरा) :- 2 ऑक्टोबर, गुरुवारी (विजय मुहूर्त – दुपारी २:२७ ते ३:१५)
*✍🏻दाते पंचांगकर्ते*
सूर्यास्तानंतर शंकराची पूजा करण्याला एक विशेष असे महत्त्व आहे कारण सूर्यास्तानंतर प्रदोष काळ सुरू होतो आणि तो रात्र सुरु होईपर्यंत असतो ,याप्रमाणे दिवस आणि रात्र याचा मध्य जो संधिकाल असतो तो २ तास २४ मिनिटे असतो, शिवपुराणानुसार या काळात शंकराची मुद्रा जास्त प्रसन्न असते,म्हणून शक्यतो या काळात शंकराची पूजा करावी ,प्रसन्न होतात.
*बिल्वपत्र महात्म्य़ बिल्व ☘️{ बेल पान }*
*१ ) बिल्व वृक्षा जवळ साप कधीही येत नाही.*
*२ ) कुणाचीही प्रेत यात्रा जर बिल्व वृक्षाच्या सावलीतून*
*।। जात असेल तर त्यास मोक्ष मिळतो.*
*३ ) वायुमंडळात व्याप्त अशुध्द वातावरणास*
*।। थांबवण्याची क्षमता सर्वात ज्यास्त बिल्व वृक्षात असते*
*४ ) ४, ५, ६, ७ पाणांचे बेल पत्र ज्यास प्राप्त होतात*
*।। तो परम भाग्यशाली असून जर ते बिल्व पत्र भगवान*
*।। शिवजीस अर्पण करण्याने अनंत पट पुण्य फल प्राप्त होते*
*५ ) बिल्व वृक्षास कापल्याने वंशाचा नाश होतो आणी*
*।। बिल्व वृक्ष लावण्याने वंश वृद्धि होते.*
*६ ) सकाळ संध्याकाळ बिल्व वृक्षाचे दर्शन घेतल्याने*
*।। पापांचा नाश होतो*
*७ ) बिल्व वृक्षास कायम पाणी दिल्याने पित्तर तृप्त होतात*
*८ ) बिल्वपत्र आणी ताम्र धातुच्या विशेष प्रयोग ने पुर्वी*
*।। ऋषि मुनि स्वर्ण धातु चे उत्पादन करत होते .*
*९ ) जीवनात फक्त एक वेळेस आणि ते ही नकळत*
*।। शिवलिंग वर बिल्व पत्र अर्पण केल्यास सर्व पापांतून ।। मुक्ती मिळते.*
*१० ) बिल्व वृक्ष रोपण, पोषण आणि संवर्धन करण्याने*
*।। देवाधिदेव महादेव यांचा साक्षात्काराचा अवश्य लाभ होतो*
*११ ) बिल्व वृक्षाचे शेतात पाण्याची कमतरता नसते.*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Kolhapur