My3F News
23/09/2025
My3F News
दि.23 सप्टेंबर 2025
अखेर रायगव्हाण मध्यम प्रकल्प 100% पूर्ण क्षमतेने भरला सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
23/08/2025
#मुंबई दि.२३\०८
मुंबईला जाणाऱ्या #लातूरकरांसाठी आनंदाची बातमी... #वंदेभारत एक्सप्रेस आता लातूर - मुंबई धावणार ?
देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे पसरत आहे यातच महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात वंदे भारत धावत आहे. नुकतच नागपूर - पुणेदरम्यान वंदे भारत धावत आहे त्याला खूप मोठा प्रतिसाद आहे व प्रवास सोयीचा होत असल्यामुळे जिथे जास्त गरज असेल तिथे वंदे भारत धावणार आहे. तसेच आता मुंबई - लातूर ही दोन शहरे वंदे भारत एक्सप्रेस ने जोडली जात आहेत. त्यामुळे लातूरकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. लातूर ते मुंबई जाणारी प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे परंतु सध्याची ट्रेन ही अपुरी असल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे यातच लातूरकरांना आता मुंबई गाठणे सोयीचे होणार आहे.